India vs New Zealand 1st Test: भारत आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि संपूर्ण संघ ३१.२ षटकांत अवघ्या ४६ धावांत सर्वबाद झाला. संघासाठी केवळ दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. बेंगळुरूमधील भारतीय संघाची फलंदाजी पाहून सर्वच चकित झाले. देशातील काही माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरवर जोरदार टीका करत आहेत. बंगळुरू कसोटीसाठी त्यांची रणनिती योग्य नव्हती असे त्याचे मत आहे.

पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. मात्र, तो विशेष काही करू शकला नाही आणि खाते न उघडताच बाद झाला. यानंतर माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया समोर आली आहे. गौतम गंभीरच्या निर्णयावर भाष्य करताना दिनेश कार्तिक नेमकं काय म्हणाला.

Rohit Sharma Statement on India All Out At 46 and Batting First Decision After Winning Toss In Press Conference IND vs NZ
Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
How India Were All Out For 46 Rohit Sharma Decision of Batting First After Winning Toss Promoting Virat Kohli at No 3 IND vs NZ
IND vs NZ: भारताच्या वाताहतीला ‘हे दोन’ निर्णय कारणीभूत, रोहित शर्माच्या निर्णयाचा बसला मोठा फटका, तर विराट…
Rohit Sharma Statement on Mohammed Shami Injury Said We Dont Want to Bring Injured Shami to Australia
Rohit Sharma on Mohammed Shami: “शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणं शक्य नाही…”, रोहित शर्माने मोहम्मद शमीबद्दल केलं मोठं वक्तव्य, कर्णधार नेमकं काय म्हणाला?
MS Dhoni new look photo viral
MS Dhoni : ‘तपकिरी केस, हिरवा चष्मा आणि हलकी दाढी’, माहीच्या नव्या लूकने चाहत्यांना लावले वेड, फोटो व्हायरल
former cricketer Wasim Jaffer
रणजीपाठोपाठ इराणी जेतेपदाने मुंबईचे वर्चस्व अधोरेखित! १९९७च्या विजेत्या संघातील सदस्य वसिम जाफरचे मत
India vs Bangladesh 1st T20I
युवा खेळाडूंच्या कौशल्याचा कस; भारत-बांगलादेश पहिली ट्वेन्टी२० लढत आज
KL Rahul Reveals How Rohit Sharma Clear Message Revived Hopes in Team India for Victory in IND vs BAN
IND vs BAN: “रोहितचा मेसेज स्पष्ट होता, आऊट झालो तरी हरकत नाही, पण…”, केएल राहुलने सांगितला कर्णधाराचा प्लॅन

हेही वाचा – IND vs NZ: “कमीत कमी भारत ३६…”, टीम इंडिया ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मायकेल वॉनने उडवली खिल्ली, भारतीय चाहत्यांनी ‘अशी’ केली बोलती बंद

क्रिकबझशी चर्चा करताना कार्तिक म्हणाला, “मी विराट कोहलीची बाजू घेत नाही. पण त्याच्याकडे महान फलंदाजांसारखे गुण आणि तंत्र आहे. जर मी संघात बदल केले तर फलंदाजाला त्याच क्रमांकावर फलंदाजीला पाठवेन जिथे तो चांगली कामगिरी करू शकतो. विराट कोहली वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो, टी-२० मध्ये तो सलामीला उतरतो. चेंडू हा प्रत्येक फॉरमॅटनुसार वेगळा आहे. पण कसोटीमध्ये विराट कोहलीसाठी सर्वात्तम स्थान कोणते असेल तर चौथ्या क्रमांकावर आहे.”

हेही वाचा – IND vs NZ: न्यूझीलंड संघ भारतावर पडला भारी, १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाने भारताविरुद्ध घेतली एवढी मोठी आघाडी

गंभीरने केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर उतरवायला हवे होते, असे दिनेश कार्तिकचे मत आहे. तो म्हणाला, “खरंतर विराट कोहलीचंही कौतुक केलं पाहिजे. विराट कोहली असं म्हणू शकला असता की, मला तिसऱ्या क्रमांकावर नव्हे तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. तुम्ही केएल राहुल किंवा सर्फराज खान यापैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणं शक्य होतं. पण विराटने सांगितलं की मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे.”

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, “मला अजूनही असं वाटतं की केएल राहुलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी होती. हे माझे स्वतःचे मत आहे. मी गंभीरच्या या विचाराशी सहमत नाही की आपण समान फलंदाजीचा क्रम ठेवला पाहिजे जेणेकरून त्यांच्या विचार प्रक्रियेत सातत्य राहील आणि शेवटी निकाल समोर येतील.”