Aakash Chopra upset with Rishabh Pant not being captain in Duleep Trophy 2024 : टीम इंडिया सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेकवर आहे. मात्र आता भारतीय संघातील खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेसाठी चार संघही जाहीर करण्यात आले आहेत. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही २०२२ नंतर दुलीप ट्रॉफीमधून पुनरागमन करणार आहे. अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली पंतला इंडिया-बी टीममध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, या स्पर्धेत पंतला कर्णधारपद न मिळाल्याने माजी भारतीय दिग्गज संतापला आहे.

‘पंत कर्णधार नाही, मला आश्चर्य वाटतंय’ –

आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आकाश चोप्रा म्हणाला, “ऋषभ पंत कर्णधार नाही. त्याची अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्त्वाखालील संघात निवड झाली आहे. तो अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, जे अगदी ठीक आहे. मात्र, ऋषभ पंतही कसोटी कर्णधारपदाचा उमेदवार नाही का? मला थोडं आश्चर्य वाटतंय.” ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा कसोटीतील पंतची खेळी कोणीही विसरू शकत नाही. गाबा कसोटी टीम इंडियाला जिंकून देण्यात ऋषभने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Cricket Test series, India, bangladesh
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेवर बिघडलेल्या संबंधांचे प्रतिबिंब? पाकिस्तानप्रमाणेच भारतीय संघालाही बांगला खेळाडू चिथावणार का?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
India Captain: रोहित शर्मानंतर कोण होणार भारताचा तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार? माजी भारतीय खेळाडूने सांगितली दोन नावं
PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Harbhajan Singh Statement on Rohit Sharma MS Dhoni
Harbhajan Singh: “धोनी खेळाडूंशी बोलत नाही, तर रोहित…” भारतीय कर्णधारांवर हरभजन सिंगचे वक्तव्य, सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून ‘या’ खेळाडूला पसंती
Zaheer Khan has been appointed as the mentor
Zaheer Khan : झहीर गुरुजी देणार लखनौला शिकवणी; गौतम गंभीरच्या जागी नियुक्ती

माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला, “मी वैयक्तिकरित्या या बाबतीत सहमत नाही कारण तुम्ही कसोटी क्रिकेटर म्हणून ऋषभ पंतचा सर्वोत्तम फॉर्म पाहिला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत शतके झळकावणारा तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव यष्टिरक्षक आहे. शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि अगदी अभिमन्यू ईश्वरन देखील कर्णधार आहेत, पण पंत कर्णधार नाही आणि माझ्या मते ही मोठी गोष्ट आहे.”

हेही वाचा – Mady Villiers Catch : जॉन्टी ऱ्होड्सच्या शैलीत ‘या’ महिला क्रिकेटपटूने हवेत झेपावत एका हाताने घेतला आश्चर्यकारक झेल

स्पर्धेत ६ सामने खेळवले जाणार आहेत –

दुलीप ट्रॉफी २०२४ या स्पर्धा ५ ते १९ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार. ज्यासाठी चार संघांची निवड करण्यात आली आहे. शुबमन गिलला टीम-एचा कर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय टीम-बीची धुरा अभिमन्यू ईश्वरनच्या हाती आहे. टीम-सीचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे आणि टीम-डीचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे. स्पर्धेदरम्यान या सर्व संघांमध्ये ६ सामने खेळवले जाणार आहेत.