* तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा ७ विकेट राखून विजय
* इंग्लंडची मालिकेत २-१ अशी आघाडी
* कुक ठरला सामनावीर पुरस्काराचा मानकरी
‘‘आम्ही वाईट खेळलो, खेळपट्टीला दोष देण्यात काहीच अर्थ नाही,’’ असे भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग शनिवारी सायंकाळीच म्हणाला होता. त्याच्या विधानात नक्कीच तथ्य होते. पण हे सत्य स्वीकारणाऱ्या वीरूने कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या ‘खेळपट्टी’ या जखमेलाच नकळत स्पर्श केला. वानखेडेची फिरकीला अनुकूल खेळपट्टी असो किंवा ईडन गार्डन्सची पाटा खेळपट्टी असो.. भारतीय संघ दोन्ही परीक्षांमध्ये नापास झाला, तर इंग्लिश संघ दोन्ही परीक्षांत अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला. धोनीचा ‘मिडासटच’ आता संपलेला आहे, याची पुरती जाणीव क्रिकेटरसिकांना झालेली आहे. मुंबईपाठोपाठ कोलकात्यावरही इंग्लिश संघाने वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे आता नागपूरची कसोटी जिंकून मालिका वाचविण्याशिवाय भारताकडे पर्याय नाही. कारण तिसऱ्या कसोटीत ७ विकेट राखून दणदणीत विजय मिळवत इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा