India vs Pakistan World Cup 2023 Match Tickets: प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या बीसीसीआयने केलेल्या व्यवस्थेमुळे चाहते कमालीचे निराश झाले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असूनही चाहत्यांना तिकिटे देण्यात बीसीसीआय पूर्णपणे अपयशी ठरले आहे. विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या तिकीट भागीदार बुक माय शोच्या वेबसाइटवर तासनतास प्रतीक्षा केल्यानंतरही चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सामन्यांची तिकिटे मिळू शकली नाहीत. आता तीच तिकिटे इतर प्लॅटफॉर्मवर लाखोंला विकली जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार, भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक सामन्याची तिकिटे दुय्यम बाजारात ₹५६ लाखांपर्यंत विकली जात आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे व्हायगोगोवर ५७,६२,६७६ रुपयांना विकली जात आहेत. उर्वरित सामन्यांची तिकिटेही ₹१८ ते ₹२२ लाखांपर्यंत विकली जात आहेत.दरम्यान, चाहत्यांनी बुक माय शोच्या सत्यतेवर शंका घेण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावरील चाहत्यांनी तिकिटांच्या किमतीचे वर्णन “हास्यास्पद” केले आहे. एका चाहत्याने सांगितले, “तिकीट विक्री करणारी वेबसाईट व्हायगोगो प्रचंड किमतीत तिकीट विकत आहे. सर्व तिकिटे अधिकृतपणे अधिकृत तिकीट भागीदार बुक माय शोद्वारे विकली जातात, तेव्हा हे कसे शक्य आहे असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.” विश्वचषक सामन्यांची सर्व तिकिटे या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होत नसल्याचा संशय असल्याने चाहत्यांनी बुक माय शोकडे योग्य आकडे जाहीर करण्याची मागणी केली.एका वापरकर्त्याने लिहिले, “बुक माय शोकने १,३२,००० तिकिटांपैकी किती तिकिटे प्रत्यक्षात विक्रीसाठी ठेवली होती. त्याचबरोबर दोन्ही तारखांना त्यांची किती विक्री झाली याचा अधिकृत डेटा शेअर करावा. तसेच हा डेटा सर्व सामन्यांसाठी अधिकृतपणे सामायिक केला जावा.”

हेही वाचा – VIDEO: टीम इंडियाच्या खेळाडूंनी जिंकले नेपाळ संघाचे मन, सोशल मीडियावरुन होतोय कौतुकांचा वर्षाव

सेलिब्रिटींना गोल्डन तिकिट सामन्य चाहत्यांचे काय?

मंगळवारी भारताच्या विश्वचषक संघाच्या घोषणेसोबतच बीसीसीआयने अभिनेते अमिताब बच्चन यांना गोल्डन तिकीट देऊन गौरविले. ज्यावर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर एका चाहत्याने लिहिले, “त्यांना सोनेरी तिकिटे द्या पण थोडी लाज किंवा प्रतिष्ठा ठेवा आणि लोकांना किमान सामान्य तिकिटे मिळू द्या. क्रिकेट उत्कटतेने पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या घरात विश्वचषक स्पर्धा पाहता येत नाही, पण सेलिब्रिटींना ते मोफत मिळतात ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे.”

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, कपिल देव ते रॉबिन उथप्पापर्यंतच्या माजी क्रिकेपटूंनी दिल्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणाले?

दरम्यान, माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद चाहत्यांसोबत उभे राहिले आहेत. त्यांनी बीसीसीआयकडे तिकीट खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली. प्रसाद यांनी ट्विट केले की, “विश्वचषकाची तिकिटे मिळवणे कधीच सोपे नव्हते. पण यावेळेस पूर्वीपेक्षा अवघड आहे. अधिक चांगले नियोजन करता आले असते आणि ज्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या आणि आता तिकीट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. मला आशा आहे की, खेळातील सर्वात महत्त्वाच्या भागधारकांपैकी एक असलेल्या चाहत्यांना त्यांचे मूल्य मिळेल आणि मला आशा आहे की बीसीसीआय चाहत्यांसाठी ते सोपे करेल.”

माजी क्रिकेटपटूने पुढे लिहिले की, “मी बीसीसीआयला विनंती करतो की, वर्ल्ड कप तिकीट प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता असावी आणि चाहत्यांना गृहीत धरू नये. अहमदाबाद सारख्या स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाक सामन्यांची ८५०० पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली असतील, जेव्हा क्षमता एका लाखांपेक्षा जास्त असेल. त्याचप्रमाणे इतर सर्व सामन्यांसाठी चाहत्यांचे प्रमाण मोठे असणे आवश्यक आहे. कॉर्पोरेट आणि सदस्यांसाठी मोठा हिस्सा राखून ठेवण्याऐवजी चाहत्यांना आनंदी ठेवले आणि या संधीपासून वंचित न ठेवल्यास ते अधिक समाधानकारक असेल.”

लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार, भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक सामन्याची तिकिटे दुय्यम बाजारात ₹५६ लाखांपर्यंत विकली जात आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे व्हायगोगोवर ५७,६२,६७६ रुपयांना विकली जात आहेत. उर्वरित सामन्यांची तिकिटेही ₹१८ ते ₹२२ लाखांपर्यंत विकली जात आहेत.दरम्यान, चाहत्यांनी बुक माय शोच्या सत्यतेवर शंका घेण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावरील चाहत्यांनी तिकिटांच्या किमतीचे वर्णन “हास्यास्पद” केले आहे. एका चाहत्याने सांगितले, “तिकीट विक्री करणारी वेबसाईट व्हायगोगो प्रचंड किमतीत तिकीट विकत आहे. सर्व तिकिटे अधिकृतपणे अधिकृत तिकीट भागीदार बुक माय शोद्वारे विकली जातात, तेव्हा हे कसे शक्य आहे असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.” विश्वचषक सामन्यांची सर्व तिकिटे या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होत नसल्याचा संशय असल्याने चाहत्यांनी बुक माय शोकडे योग्य आकडे जाहीर करण्याची मागणी केली.एका वापरकर्त्याने लिहिले, “बुक माय शोकने १,३२,००० तिकिटांपैकी किती तिकिटे प्रत्यक्षात विक्रीसाठी ठेवली होती. त्याचबरोबर दोन्ही तारखांना त्यांची किती विक्री झाली याचा अधिकृत डेटा शेअर करावा. तसेच हा डेटा सर्व सामन्यांसाठी अधिकृतपणे सामायिक केला जावा.”

हेही वाचा – VIDEO: टीम इंडियाच्या खेळाडूंनी जिंकले नेपाळ संघाचे मन, सोशल मीडियावरुन होतोय कौतुकांचा वर्षाव

सेलिब्रिटींना गोल्डन तिकिट सामन्य चाहत्यांचे काय?

मंगळवारी भारताच्या विश्वचषक संघाच्या घोषणेसोबतच बीसीसीआयने अभिनेते अमिताब बच्चन यांना गोल्डन तिकीट देऊन गौरविले. ज्यावर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर एका चाहत्याने लिहिले, “त्यांना सोनेरी तिकिटे द्या पण थोडी लाज किंवा प्रतिष्ठा ठेवा आणि लोकांना किमान सामान्य तिकिटे मिळू द्या. क्रिकेट उत्कटतेने पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या घरात विश्वचषक स्पर्धा पाहता येत नाही, पण सेलिब्रिटींना ते मोफत मिळतात ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे.”

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, कपिल देव ते रॉबिन उथप्पापर्यंतच्या माजी क्रिकेपटूंनी दिल्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणाले?

दरम्यान, माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद चाहत्यांसोबत उभे राहिले आहेत. त्यांनी बीसीसीआयकडे तिकीट खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली. प्रसाद यांनी ट्विट केले की, “विश्वचषकाची तिकिटे मिळवणे कधीच सोपे नव्हते. पण यावेळेस पूर्वीपेक्षा अवघड आहे. अधिक चांगले नियोजन करता आले असते आणि ज्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या आणि आता तिकीट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. मला आशा आहे की, खेळातील सर्वात महत्त्वाच्या भागधारकांपैकी एक असलेल्या चाहत्यांना त्यांचे मूल्य मिळेल आणि मला आशा आहे की बीसीसीआय चाहत्यांसाठी ते सोपे करेल.”

माजी क्रिकेटपटूने पुढे लिहिले की, “मी बीसीसीआयला विनंती करतो की, वर्ल्ड कप तिकीट प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता असावी आणि चाहत्यांना गृहीत धरू नये. अहमदाबाद सारख्या स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाक सामन्यांची ८५०० पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली असतील, जेव्हा क्षमता एका लाखांपेक्षा जास्त असेल. त्याचप्रमाणे इतर सर्व सामन्यांसाठी चाहत्यांचे प्रमाण मोठे असणे आवश्यक आहे. कॉर्पोरेट आणि सदस्यांसाठी मोठा हिस्सा राखून ठेवण्याऐवजी चाहत्यांना आनंदी ठेवले आणि या संधीपासून वंचित न ठेवल्यास ते अधिक समाधानकारक असेल.”