Virender Sehwag on Team India: एका कार्यक्रमात बोलताना भारताचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागने संघातील होणाऱ्या बदलांवर सूचक विधान केले आहे. त्याच्यामते संघातील बदल हे सहज आणि हळुवारपणे पण टप्याटप्याने झाले पाहिजेत. त्याला भारतीय क्रिकेटच्या भवितव्याबद्दल विचारले असता, तो म्हणाला की, “आता टीम इंडियामध्ये बदलाचा टप्पा हळूहळू सुरू झाला पाहिजे, जसे १०-१२ वर्षांपूर्वी झाला होता.”

वीरू पुढे म्हणाला की, “भारतातील बहुतेक स्टार क्रिकेटपटू आता ३५+ वयोगटातील आहेत. अशा स्थितीत १० वर्षांपूर्वी जसे आधी गौतम गंभीर मग मी आणि युवराज सिंग यांना ज्या पद्धतीने काढले होते त्याच पद्धतीने बदलाची सुरुवात व्हायला हवी. त्यावेळी जे केलं तेच आताच्या निवडकर्त्यांनी करण्याची गरज आहे.” अमर उजाला या वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना सेहवागला विचारले की, “तुला भारतीय क्रिकेटचे भविष्य काय दिसते? नवीन खेळाडूंना वेळ देण्याची संधी आली आहे का? आयपीएलने काही चांगले खेळाडू पाहिले आहेत, त्यामुळे नवीन संघ तयार करण्याची ही योग्य वेळ आहे असे तुला वाटते का? विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या जुन्या खेळाडूंनी हळूहळू पायउतार व्हावे आणि मागे बसावे?” या सर्व प्रश्नांवर त्याने सविस्तर उत्तरे दिली.

IND W vs PAK W match Harmanpreet Kaur Injury Video viral
Harmanpreet Kaur : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या मानेला गंभीर दुखापत, VIDEO व्हायरल
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
former cricketer Wasim Jaffer
रणजीपाठोपाठ इराणी जेतेपदाने मुंबईचे वर्चस्व अधोरेखित! १९९७च्या विजेत्या संघातील सदस्य वसिम जाफरचे मत
Sanjay Manjrekar comment created Controversy face the taunt of Mumbai lobby
‘उत्तरेकडील खेळाडूंकडे मी फारसे लक्ष…’, संजय मांजरेकर वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल; चाहते म्हणाले, ‘मुंबई लॉबी…’
chess olympiad 2024 grandmaster abhijit kunte interview
आता तुल्यबळ खेळाडूंची फळी निर्माण करण्यावर भर – कुंटे
Sanjay Manjrekar on Mohammed Shami for Border Gavaskar Trophy
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी फिट नसेल तर ‘हा’ गोलंदाज उत्तम पर्याय; संजय मांजरेकरांचं वक्तव्य
IND vs BAN Sanjay Manjrekar Statement on Rohit Sharma For Not Giving Bowling to Ravindra Jadeja
IND vs BAN: “रोहितला हे आकडे दाखवण्याची गरज…”, रोहित शर्मावर भडकला माजी भारतीय क्रिकेटपटू, जडेजाला गोलंदाजी न दिल्याबद्दल सुनावलं
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील

हेही वाचा: Virender Sehwag: “विराट-कुंबळे वादात प्रशिक्षक होण्याची ऑफर आली होती पण…” माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागचे मोठे विधान

भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल चांगले आहे -सेहवाग

भारतीय क्रिकेटमधील बदलांवर सेहवाग म्हणाला, “भारतीय क्रिकेटचे भविष्य खूप चांगले आहे हे मला नक्कीच समजते. जर तुम्ही आयपीएल बघितले तर भारतीय क्रिकेटमध्ये खूप प्रतिभा आहे, मग ती फलंदाजी असो वा गोलंदाजी. पण जर विराट कोहली किंवा रोहित शर्मासारखे वरिष्ठ खेळाडू ३३-३ किंवा ३५ वर्षांचे असतील तर थोडा धीर धरावा लागेल. त्यांच्यात अजून क्रिकेट बाकी आहे. बदलाची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली पाहिजे. ती एक-एक असावे.”

पुढे बोलताना सेहवाग म्हणाला की, “जर तुम्ही या सर्वांना एकत्र फेकले तर कदाचित आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे कदाचित आता योग्य वेळ नाही, पण एक वेळ नक्कीच येईल जेव्हा बदल घडेल. जेव्हा आपण भारतीय संघात खेळायचो, तेव्हा आधी गौतम गंभीरला वगळले, नंतर सेहवाग, युवराज सिंग आणि शेवटी सचिन तेंडुलकर. हळूहळू एक-एक खेळाडू बाहेर पडला आणि त्याच्याजागी बदली खेळाडू येत राहिले आणि भारतीय संघ स्थिर झाला. एकाच वेळी तीन-चार खेळाडूंना काढून टाकले तर संघावर दडपण येईल आणि अडचणीही येतील. या स्थितीत द्विपक्षीय मालिका जिंकणे कठीण होईल.”

हेही वाचा: Yuzi Chahal: कसोटी क्रिकेटमध्ये करिअर करण्यापासून वंचित राहिलेला युजी चहल म्हणतो, “एवढे वर्ष झाले स्वप्न पूर्ण…”

सेहवागने ‘या’ खेळाडूंना संघात घ्यावे असे वाटते

सेहवाग म्हणाला, “अशी अनेक मुले आहेत जी चांगली आहेत. पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल (जो अजूनही संघात आहे), इशान किशन हे माझे आवडते प्रतिभावान खेळाडू आहेत. बघा, इशानने एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकले पण त्यानंतर त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली नाही. यश दयाल, रवी बिश्नोई जे अप्रतिम लेग-स्पिनर आहे. त्यामुळे असे अनेक क्रिकेटपटू आहेत जे नजीकच्या काळात टीम इंडियाचे सुपरस्टार होतील, पण त्याला वेळ लागेल. आता ही योग्य वेळ आहे असे मला वाटत नाही, कारण रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये असे माझे मत आहे. जेव्हा तुम्ही शांत असाल, तेव्हा भारतीय संघासाठी काय चांगले असू शकते हे तुम्ही ठरवावे.”