भारतामध्ये प्रो-कबड्डीमुळे कबड्डीला पुन्हा एकदा अच्छे दिन आले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी वर्ष झालीयेत या स्पर्धेला. यंदा या स्पर्धेचा सहावा हंगाम सुरु आहे. मात्र पहिल्या ५ सत्रांमध्ये प्रो-कबड्डीला मिळालेला प्रतिसाद ( सहाव्या हंगामात प्रेक्षकांनी कबड्डीकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय) पाहून या देशातील क्रीडा प्रेमी नागरिकांना (खरंतर क्रिकेट प्रेमी नागरिकांना) आपल्या मातीच्या खेळाची आठवण झाली. एरवी कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धांच्या सामन्याचं थेट प्रेक्षपण कोणत्या क्रीडा वाहिनीवर झालेलं माझ्या ऐकिवात नाही, आणि झालं जरी असलं तरीही त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद हा वादाचा मुद्दा राहिलेला आहे. तर मुद्दा असा आहे, की प्रो-कबड्डीला मिळणारा प्रतिसाद पाहून राष्ट्रीय स्पर्धेच्या सामन्यांचं प्रक्षेपणही क्रीडा वाहिन्यांवर जोमाने व्हायला सुरुवात झाली. कबड्डी हा भारताच्या मातीतला खेळ, जगाला या खेळाची ओळख आपण करुन दिली. आशियाई खेळांमध्ये आपण यातले अनभिषिक्त सम्राट होतो. मात्र २०१८ सालातील काही घडामोडींनी भारतीय कबड्डीला स्वतःच्या कारभाराबद्दल गांभीर्याने विचार करायला भाग पाडलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा