Many captains have come and many captains will come but none can match MS Dhoni’s captaincy: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर त्याच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत ५ ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक सुरू होत असताना गंभीरने महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदावर गंभीरने असे विधान केले आहे, जे माहीच्या चाहत्यांचे मन जिंकत आहे. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात गंभीर म्हणाला की, कर्णधारपदाच्या बाबतीत कोणीही महेंद्रसिंग धोनीची बरोबरी करू शकत नाही.

स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “भारतीय क्रिकेटमध्ये एमएस धोनीच्या कर्णधारपदाची बरोबरी कोणीही करू शकत नाही, अनेक कर्णधार आले आणि अनेक कर्णधार येतील. पण मला वाटत नाही की त्याच्या कर्णधारपदाची बरोबरी कोणी करू शकेल. आपल्या नेतृत्वाखाली तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या माणसासाठी यापेक्षा मोठी उपलब्धी असू शकते, असे मला वाटत नाही.”

chaggan bhujbal
..तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या- छगन भुजबळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Cricketer from Dombivli Shreyas Gurav has been selected in mumbai Ranji team
डोंबिवलीच्या श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड
IND vs ENG Harry Brook Clean Bowled on Varun Chakravarthy in 2nd T20I Despite no Smog
IND vs ENG: “बघ धुकं आहे का?”, हॅरी ब्रुक वरूणच्या गोलंदाजीवर पुन्हा क्लीन बोल्ड, विकेट पाहून झाला चकित; VIDEO व्हायरल
Gautam Gambhir Manoj Tiwary Controversy : Gautam says Sourav Ganguly apna jack laga ke aaya Manoj Tiwary has revealed
Manoj Tiwary : ‘तो जॅक लावून आला आणि तू पण…’, गंभीरने गांगुलीबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य; मनोज तिवारीचा खुलासा

यापूर्वी सुद्धा गौतम गंभीरने केले होते माहीचे कौतुक –

काही दिवसांपूर्वी गौतम गंभीर म्हणाला होता की, “जर धोनीने कारकिर्दीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती, तर तो एकदिवसीय सामन्यांमध्ये अनेक विक्रम मोडू शकला असता. लोक नेहमी कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीबद्दल बोलतात, जे अगदी खरे आहे. पण मला वाटतं त्याच्या कर्णधारपदामुळे त्याने फलंदाजीत खूप त्याग केला. त्याला बॅटने आणखी बरेच काही साध्य करता आले असते, जे त्याने केले नाही. हे जेव्हा तुम्ही कर्णधार असता, तेव्हा हे घडते. कारण मग तुम्ही संघाला पहिले प्राधान्य देता आणि स्वतःबद्दल विसरून जाता.”

हेही वाचा – Asian Games: सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदकावर कोरले नाव

एमएस धोनीने २००७ मध्ये भारताचे कर्णधारपद स्वीकारले आणि पहिल्याच वर्षी टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला. गंभीर आणि धोनी यांनी मिळून टीम इंडियासाठी आयसीसी विश्वचषक २०११ चे विजेतेपद पटकावले होते. या दोघांनी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार अर्धशतके झळकावली. धोनीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या, तर गंभीरने ९७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती.

हेही वाचा – AUS vs NED: ऑस्ट्रेलियन संघ राजकोटच्या उष्णतेतून थेट पोहोचला केरळच्या सुंदर वातावरणात, वॉर्नरने शेअर केला VIDEO

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने ३ आयसीसी विजेतेपद जिंकले, ज्यात एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचाही समावेश आहे. २०१९ चा विश्वचषक धोनीचा शेवटचा होता, त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमचा निरोप घेतला.

Story img Loader