टी-२० विश्वचषक २०२२ हरल्यानंतर भारतीय संघात बदल करण्याची मागणी सातत्याने होत आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या घरच्या मालिकेसाठी संघात काही बदल करण्यात आले आहेत. टी-२० मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली असून अनेक युवा खेळाडूंनाही संघाचा भाग बनवण्यात आले आहे. आता माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीरने भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. तसेच पृथ्वी शॉवर लक्ष देण्याची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम गंभीरने भारतीय संघ व्यवस्थापनाला “प्रतिभावान” पृथ्वी शॉला संघातून वगळल्यापासून ते हाताळल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये केवळ एकदा पन्नासपेक्षा अधिक धावा केल्या आहेत, परंतु तो पांढऱ्या चेंडूत चांगला फॉर्ममध्ये आहे. कारण त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये १८१.४२च्या स्ट्राइक रेटने ३३६ धावा केल्या होत्या.

गंभीरने शॉच्या प्रगतीवर लक्ष न ठेवल्याबद्दल निवडकर्ते आणि कोचिंग स्टाफवर टीका केली –

गौतम गंभीरने २३ वर्षीय स्टार फलंदाज पृथ्वी शॉबद्दल स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला, “तेथे प्रशिक्षक कशासाठी आहेत? तेथे निवडकर्ते कशासाठी आहेत? केवळ संघ निवडण्यासाठी किंवा कदाचित ते थ्रो-डाउन करण्यासाठी किंवा त्यांना खेळासाठी तयार करण्यासाठी नाही. शेवटी निवडकर्ते आणि प्रशिक्षक आणि व्यवस्थापन यांनी या मुलांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूकडे कोणत्या प्रकारची प्रतिभा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कदाचित त्यांनी त्याला योग्य मार्गावर आणावे आणि ते व्यवस्थापनाचे काम आहे.”

हेही वाचा – IND vs SL T20 Series: शुबमन गिलने नवीन हेअरस्टाईलसाठी मोजले चक्क १८ हजार रुपये; पाहा त्याचा नवीन लूक

गंभीरने राहुल द्रविडला पृथ्वीशी बोलण्याची विनंतीही केली –

गंभीर पुढे म्हणाला, “मला वाटते की जर असे असेल तर (फिटनेस आणि जीवनशैलीच्या समस्या), कोणीतरी मग ते राहुल द्रविड असो किंवा निवड समितीचा अध्यक्ष यांनी त्याच्याशी बोलले पाहिजे. तसेच त्याला स्पष्टता द्या आणि त्याला ग्रुपमध्ये ठेवा. त्याने गटाच्या आसपास असले पाहिजेत, जेणेकरून त्याचे अधिक चांगले निरीक्षण केले जाऊ शकते. कारण ज्या क्षणी तुम्ही त्यांना एकटे सोडाल, ते सर्वत्र जाऊ शकतात.”

हेही वाचा – India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला ट्वेन्टी-२० सामना कधी? कुठं मोफत पाहता येणार

गंभीरनेही शॉला थोडी परिपक्वता दाखवण्यास सांगितले. “जर तुम्ही देशासाठी खेळण्यासाठी समर्पित आणि उत्कट असाल, तर तुम्हाला फिटनेस असो की शिस्त, सर्व पॅरामीटर्स बरोबर मिळू शकतील.” श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल आणि दीपक हुडा या युवा खेळाडूंना भारतीय संघाचा भाग बनवण्यात आले होते, मात्र पृथ्वी शॉला या संघापासून दूर ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir slams rahul dravid and selectors for ignoring prithvi shaw vbm