Gautam Gambhir trolled for his comments during India Pakistan match in Asia Cup 2023: २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. या भारतीय संघाचा भाग असलेला सलामीवीर गौतम गंभीर नेहमी म्हणतो की, कोणताही सामना एका खेळाडमुळे जिंकत नाही, तर संपूर्ण संघामुळे जिंकतो. भारत आणि श्रीलंका यांच्यात २०११ च्या विश्वचषक फायनलमध्ये धोनीने विजयी षटकार मारल्याच्या कौतुकाच्या विरोधात गंभीरचे हे विधान येत असते. त्याच्या मते २०११ च्या विश्वचषक विजयामागे युवराज सिंग आणि त्याच्यासारख्या खेळाडूंचा हात होता. त्यामुळे या विजयाचे श्रेय एकट्या धोनीला देणे चुकीचे आहे, असे वक्तव्य गंभीरने वेगवेगळ्या प्रसंगी अनेकदा केले आहे.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंभीरने महत्त्वपूर्ण ९७ धावा केल्या होत्या, तर धोनीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या. सामना संपण्यापूर्वी गंभीर बाद झाला असला, तरी धोनीने ४९व्या षटकात नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर शानदार षटकार ठोकून भारताला विजेतेपद मिळवून दिले.
मात्र, आता गंभीरचा सूर बदललेला दिसतो आहे. कारण त्याने नुकत्याच केलेल्या एका विधानात म्हटले आहे की, शेवटच्या धावा करणारा खेळाडूच सामना जिंकवून देतो.

IND vs NZ Rachin Ravindra reveals how CSK helped to him prepare to beat India
IND vs NZ : रचिन रवींद्रने भारताला हरवण्यासाठी केली होती जोरदार तयारी; धोनीच्या संघाने दिली साथ, सामन्यानंतर केला मोठा खुलासा
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
How India Were All Out For 46 Rohit Sharma Decision of Batting First After Winning Toss Promoting Virat Kohli at No 3 IND vs NZ
IND vs NZ: भारताच्या वाताहतीला ‘हे दोन’ निर्णय कारणीभूत, रोहित शर्माच्या निर्णयाचा बसला मोठा फटका, तर विराट…
Babar Azam, Pakistan batsman Babar Azam,
विश्लेषण : एके काळी सर्वोत्तम, आता गच्छंती… पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमवर अशी वेळ का आली?
Rohit Sharma Stops Car on Mumbai Busy Road and Wishes Female Fan on Her Birthday Video Goes Viral
Rohit Sharma: रोहित शर्माने चाहतीच्या वाढदिवसाचा आनंद केला द्विगुणित; दिली खास भेट; VIDEO व्हायरल
Hardik Pandya No look shot video viral during India vs Bangladesh 1st T20 Match
Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या No Look शॉटने चाहत्यांना लावलं वेड, VIDEO होतोय तुफान व्हायरल
IND W vs PAK W match Harmanpreet Kaur Injury Video viral
Harmanpreet Kaur : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या मानेला गंभीर दुखापत, VIDEO व्हायरल
Sanjay Manjrekar comment created Controversy face the taunt of Mumbai lobby
‘उत्तरेकडील खेळाडूंकडे मी फारसे लक्ष…’, संजय मांजरेकर वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल; चाहते म्हणाले, ‘मुंबई लॉबी…’

शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणार्‍या आशिया चषक २०२३ च्या सामन्यात समालोचन करताना गंभीरने हे विधान केले. २०१० च्या आशिया कपमध्ये भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या संस्मरणीय विजयाबद्दल बोलताना गंभीर म्हणाला की, “जो खेळाडू विजयी धावा करतो तोच संघाला सामना जिंकून देतो.

स्टार स्पोर्ट्स शो दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ म्हणाला, “गंभीरने ८० धावा केल्या आणि आम्ही २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक सामना जिंकला.” याला उत्तर देताना गौतम गंभीर म्हणाला, “नाही, हरभजनने आम्हाला सामना जिंकून दिला. त्याने षटकार मारून सामना जिंकला. माझा विश्वास आहे की जो विजयी धावा करतो तो संघासाठी सामना जिंकतो.”

हेही वाचा – ‘आम्ही ट्रॉफी उचलली असून आशिया कपसाठी आम्ही तुमची वाट पाहतोय’; भारतीय हॉकी संघाचा रोहितच्या टीम इंडियाला खास संदेश

गौतम गंभीरचे हे नवे विधान ऐकल्यानंतर चाहते, पुन्हा एकदा त्याच्यावर टीका करत आहेत. त्याचबरोबर २०११च्या विश्वचषकातील धोनीच्या विजयी षटकाराच्या जुन्या विधानाची आठवण करून देत आहेत.