Harbhajan Singh slams Pakistani journalist about Trophy 2025 : टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग अनेकदा सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेटर्सना फटकारताना दिसतो. काही दिवसांपूर्वी, माजी पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमल आणि हरभजन सिंग यांच्यात सोशल मीडियावर जोरदार वाद झाला होता, तेव्हा भज्जीने अकमलला फटकारले होते, नंतर माजी पाकिस्तानी भारत आणि भज्जीची माफी मागताना दिसला होता. त्यानंतर आता भज्जीने एका पाकिस्तानी पत्रकाराला जोरदार फटकारले आहे.

पत्रकाराने भारतीय खेळाडूबद्दल केली पोस्ट –

वास्तविक, यावेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन करत आहे. मात्र भारताने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानी पत्रकार फरीद खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून टीम इंडियाच्या खेळाडूंची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्टमध्ये पत्रकाराने २००६ मध्ये शाहिद आफ्रिदीने हरभजन सिंगला मारलेल्या चौकार आणि षटकारांचा स्कोअरचार्ट शेअर केला आहे.

Pakistan viral video Utter chaos as unruly mob loots mall in Pakistan's Karachi on opening day
कंगाल पाकिस्तानी नागरिकांचा नवा कारनामा; लोकांनी उद्धाटनाच्या दिवशीच मॉलमध्ये काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
pm modi pakistan visit
नेहरू ते मोदी; कोणकोणत्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली? तेव्हा नक्की काय घडले? पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारतील का?
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
Kamran Akmal big statement on Virat Kohli and Rohit Sharma
Kamran Akmal : कोहली-रोहितबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “पाकिस्तानमध्ये विराटपेक्षा जास्त तर…”
Why are there bloody attacks in Balochistan How is the government of Pakistan so desperate
विश्लेषण : बलुचिस्तानात रक्तरंजित हल्ले का होत आहेत? तेथे पाकिस्तान सरकार इतके हतबल कसे?
PAK vs BAN Ahmad Shahzad Slams PCB For Pakistan Defeat Against Bangladesh
PAK vs BAN: “माझ्या आयुष्यात पाकिस्तान क्रिकेट इतके खालच्या पातळीवर…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूने PCBला सुनावलं
Ramiz Raja on PAK vs BAN Test
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘आशिया कपमध्येच भारताने पाकिस्तानची…’

यानंतर हरभजन सिंगने या पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हरभजन सिंगने २००९ मध्ये श्रीलंकेच्या टीमच्या बसवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला होता, तेव्हाचा वृत्तपत्राचा स्क्रीनशॉट शेअर केला. ही पोस्ट शेअर करताना भज्जीने लिहिले की, “नाही, यासाठी नाही. क्रिकेटमध्ये नेहमीच हार-जीत होतच राहते. मी तुम्हाला सांगतो हीच खरी समस्या आहे. हा फोटो बघा. आता इथून एफ… काढा. तुम्हाला एफचा अर्थ कळला असावा की मी समजावून सांगू? एफ म्हणजे तुमचे नाव. कृपया एफ म्हणजे काय याचा वेगळा अंदाज लावू नका. मला काय म्हणायचे आहे, ते तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे शांती राखा.”

हेही वाचा – Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीयांसाठी मोठी घोषणा, दिग्गज उद्योगपती देणार अलिशान…

२००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर काही काळासाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता इतर संघ पाकिस्तान दौऱ्यावर जात असले, तरी टीम इंडिया कधीही पाकिस्तानचा दौरा करत नाही. टीम इंडियाने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फेब्रुवारी आणि मार्चमध्ये खेळली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आशिया कपबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतरही यजमानपद पाकिस्तानकडे गेले, परंतु शेवटी ते हायब्रीड मॉडेल अंतर्गत होते, जिथे भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले आणि पाकिस्तानमध्ये फार कमी सामने खेळले गेले. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत न आल्यास त्यांच्याशिवाय ही स्पर्धा आयोजित केली जाईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावेळी स्पष्ट केले आहे. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने असेही म्हटले आहे की, पाकिस्तान भारतात होणाऱ्या आयसीसी टूर्नामेंटमध्येही सहभागी होणार नाही.

हेही वाचा – Harbhajan Singh : ‘आजकल क्या फूंक रहे हो…’, रिझवानची धोनीशी तुलना केल्याने हरभजन सिंगने पाकिस्तानी पत्रकाराला फटकारले

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. कारण ते २९ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर एका मोठ्या आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहेत. १९९६ मध्ये, त्यांनी एकदिवसीय विश्वचषक सह यजमानपद भूषवले होते. २००८ पासून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. पाकिस्तानने आयसीसीच्या विविध स्पर्धांसाठी भारताचा दौरा केला असताना, या दोघांमधील द्विपक्षीय मालिका बऱ्याच काळापासून स्थगित आहे.