Gautam Gambhir on Asia Cup 2023: भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर २०११च्या विश्वचषकाबाबत अनेकदा वक्तव्य करताना दिसतो. विजयाचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला देण्याच्या बाबतीत गंभीर अनेकदा टोमणे मारताना दिसला आहे. त्याला २०११ विश्वचषक एकट्या धोनीने जिंकवला हे अजिबात मान्य नाही. तसेच काहीसे विधान त्याने आशिया चषक २०२३मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील कॉमेंट्रीदरम्यान केले होते, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ब्रॉडकास्टरने कॅंडीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील २०१०चा सामना स्क्रीनवर दाखवला. या भारत-पाकिस्तान सामन्यात, ८३ धावा केल्याबद्दल गंभीरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्याबद्दल, कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून गंभीर म्हणतो, “मी जिंकलो नाही तर हरभजन सिंग जिंकला म्हणजेच मी नव्हे तर हरभजनने जिंकवली होती मॅच. माझ्या आणि धोनीमध्ये भागीदारी झाली, पण जो शेवटच्या धावा करतो तो जिंकतो यावर माझा विश्वास आहे. जो विजयी धावा करतो तोच संघ जिंकतो.” त्याच्या या विधानाचा अर्थ २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याशी लावत चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

Rohit Sharma Statement on India All Out At 46 and Batting First Decision After Winning Toss In Press Conference IND vs NZ
Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
BJP members protested against Canada Fact Check
Viral Photo : ‘कॅनडाविरोधात भाजपाचे आंदोलन, कॅनरा बँकेबाहेर उभं राहून…’ चर्चेतील फोटोत सत्य लपवण्याचा प्रयत्न
Loksatta explained Where exactly did the Indian women team go wrong How affected by the failure of Smriti Mandhana
जेतेपदाचे ध्येय, पण साखळीतच गारद! भारतीय महिला संघाचे नेमके चुकले कुठे? स्मृती मनधानाच्या अपयशाचा कितपत फटका?
PAK vs ENG Ben Stokes on Babar Azam
PAK vs ENG : ‘तो पाकिस्तान क्रिकेटचा…’, बाबर-शाहीन आणि नसीम यांना संघातून डच्चू देण्यावर बेन स्टोक्स काय म्हणाला? पाहा VIDEO
PAK vs ENG PCB upset on Fakhar Zaman post
PAK vs ENG : बाबरला साथ, विराटचं गुणगान यामुळे पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूवर होऊ शकते खप्पामर्जी; जाणून घ्या घटनाक्रम
IND W vs PAK W match Harmanpreet Kaur Injury Video viral
Harmanpreet Kaur : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या मानेला गंभीर दुखापत, VIDEO व्हायरल
Sanjay Manjrekar comment created Controversy face the taunt of Mumbai lobby
‘उत्तरेकडील खेळाडूंकडे मी फारसे लक्ष…’, संजय मांजरेकर वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल; चाहते म्हणाले, ‘मुंबई लॉबी…’

२०११च्या विश्वचषकातील विजयाचे श्रेय एम.एस. धोनीला देण्याच्या बाबतीत, गंभीरने अनेकदा विधान केले आहे. तो म्हणतो की, “वर्ल्ड कप फायनलच्या विजयामागे एका व्यक्तीचा हात नसून संपूर्ण संघाचे कष्ट आहेत.” धोनीला श्रेय देण्यावर त्यांनी अनेकदा आक्षेप घेतला आहे. मात्र शनिवारी झालेल्या या आशिया चषकाच्या सामन्यात कॉमेंट्री करताना त्याने केलेल्या कमेंटची क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs NEP: दुबळ्या नेपाळसमोर टीम इंडियाचे गचाळ क्षेत्ररक्षण; कोहली, श्रेयस, इशान यांनी कॅचेस सोडताच रोहित भडकला; पाहा Video

अलीकडेच विश्वचषक २०११च्या अंतिम सामन्याबाबत गंभीर म्हणाला होता की, “धोनीच्या विजयी षटकाराचे कौतुक होत आहे, पण युवराज सिंगच्या योगदानाबद्दल लोक फारसे बोलत नाहीत.” गंभीर पुढे म्हणाला होता की, “आम्ही २०११च्या विश्वचषकासाठी युवराजला पुरेसे श्रेय दिले नाही. अगदी झहीर खान, रैना आणि मुनाफ पटेल यांनाही मिळाले नाही. त्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या, पण आपण त्याच्याबद्दल बोलतो का, नाही. धोनीच्या षटकारांबद्दल मीडिया सतत बोलत असतो. तुम्हाला त्या व्यक्तींचे वेड लागले आहे, सगळेजण संघाला विसरत आहे.” त्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरने ९७ धावा केल्या होत्या आणि धोनीने ९१ धावा केल्या होत्या. त्यानंतर तब्बल १२ वर्षानंतर भारतात वन डेचा विश्वचषक होत असून कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जिंकणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या चेपॉकवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.