Hardik Pandya will again captain Team India : भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकणे अत्यंत दुर्दैवी मानले जात आहे. कारण त्याने २०२२ ते २०२४ दरम्यान अनेक वेळा संघाचे नेतृत्व केले होते. बीसीसीआय निवड समितीने २०२४ च्या टी-२० विश्वचषक जेतेपदानंतर निवृत्त होणाऱ्या रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एका रिपोर्टनुसार, सूर्यकुमार आणि रोहितच्या खराब कामगिरीमुळे हार्दिकचे कर्णधारपदी पुनरागमन होऊ शकते. सूर्यकुमार यादवने एकेकाळी आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते, परंतु जेव्हापासून त्याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले तेव्हापासून त्याचा फॉर्म घसरत गेला. गतवर्षी श्रीलंका दौऱ्यापूर्वी त्याने कर्णधारपदाची धुरा स्वीकारल्यापासून आतापर्यंत १४ डावांत त्याला केवळ २५८ धावा करता आल्या असून त्यात त्याची सरासरी केवळ १८.४२ इतकी आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मायदेशातील टी-२० मालिकेतही तो ५ डावात केवळ २८ धावा करू शकला, ज्यामध्ये त्याला दोनदा खातेही उघडता आले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा