अहमदाबाद : आमच्यासाठी जेतेपद मिळवण्याची ही उत्तम संधी होती. मात्र, अंतिम लढतीत आम्हाला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. आम्ही सर्वच खूप निराश आहोत. ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला आणि ते जिंकले. परंतु संपूर्ण विश्वचषकात आमच्या संघाने ज्याप्रकारे खेळ केला, त्याबाबत मी खूप समाधान आहे, अशी प्रतिक्रिया विश्वचषकाच्या अंतिम लढतीतील पराभवानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Australia Won World Cup 2023 Final: भारताच्या पराभवानंतर राहुल द्रविड प्रशिक्षकपद सोडणार? पत्रकार परिषदेत दिले ‘हे’ संकेत!

तसेच अंतिम लढतीत भारतीय संघाला ३०-४० धावा कमी पडल्या. या धावांनी खूप फरक पडला असता असे द्रविडला वाटते. ‘‘आम्ही २४० ऐवजी २८० किंवा २९० धावा केल्या असत्या, तर त्या गाठणे ऑस्ट्रेलियाला सोपे गेले नसते. ऑस्ट्रेलियाची १० षटकांत ३ बाद ६० अशी स्थिती होती. त्यानंतर अतिरिक्त ३०-४० धावा करताना त्यांना कदाचित दडपण आले असते,’’ असे द्रविड म्हणाला.

या संपूर्ण स्पर्धेत कर्णधार म्हणून रोहित शर्माने केलेल्या कामगिरीचे द्रविडने कौतुक केले. ‘‘रोहितचे नेतृत्व उत्कृष्ट होते. ड्रेसिंग रुममधील सर्व खेळाडूंचा त्याला कायम पाठिंबा राहिला आहे. त्याने हा संघ तयार करण्यासाठी आपला वेळ आणि उर्जा खर्ची केली आहे. फलंदाज म्हणूनही त्याने त्याचे वेगळेपण दाखवून दिले. त्याने आम्हाला नेहमी पाया रचून दिला. त्याने स्वत:च्या कामगिरीने अन्य खेळाडूंसमोर आदर्श ठेवला,’’ असेही द्रविडने नमूद केले. तसेच आता प्रशिक्षक म्हणून करार संपुष्टात आला असला, तरी भविष्याबाबत अद्याप आपण विचार केला नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Head coach rahul dravid reaction after india lost world cup final match against australia zws
Show comments