Sanjana Ganesan Hug Jasprit Bumrah Video Viral : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ जिंकून भारताने इतिहास रचला आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून टीम इंडियाने दुसऱ्यांदा या ट्रॉफीवर नाव कोरलं केला. भारताने १७ वर्षांनी दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. या स्पर्धेत भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली. फायनलमध्येही त्याने २ विकेट्स घेतल्या. विजयानंतर जसप्रीत बुमराहची त्याची पत्नी संजना गणेशनने मुलाखत घेतली. मुलाखतीत बुमराहचे काय झाले ते जाणून घेऊया.

संजनाने घेतली बुमराहची मुलाखत –

मुलाखतीत संजनाने त्याला विचारले की, “भारताने २०१३ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. तुला कसे वाटत आहे? यावर बुमराह म्हणाला, आम्ही नर्व्हस होतो पण आता आम्हाला बरे वाटत आहे. अशा प्रकारचा विजय हा आमच्यासाठी मोठा विजय आहे. वडील म्हणून इथे जगण्यापेक्षा चांगली भावना कोणती असू शकते? स्पर्धेत असे योगदान देताना खूप छान वाटले. आम्ही खूप शांतपणे खेळलो. आम्ही नाराज नव्हतो.” संजनाने त्याला पुढे विचारले, “शेवटच्या षटकात तू, अर्शदीप आणि हार्दिकने अप्रतिम गोलंदाजी केल्याचे दिसले. या मागचा विचार काय होता? यावर जसप्रीत बुमराह म्हणाला, आम्हाला खूप आत्मविश्वास होता. त्यांनी ज्या विविधतेने गोलंदाजी केली ती खूपच अप्रतिम होती.”

जसप्रीत बुमराह प्लेअर ऑफ द सीरीज जिंकल्यानंतर म्हणाला, “मी संपूर्ण मालिकेत शांत राहण्याचा प्रयत्न केला. मी खरोखर आनंदी आहे, माझा मुलगा येथे आहे, कुटुंब येथे आहे आणि आम्ही यासाठी कठोर परिश्रम करत आहोत. मोठ्या मंचावर खेळताना यापेक्षा चांगली भावना असू शकत नाही.” अंतिम सामन्याच्या १८ व्या षटकात बुमराहने मार्को यानसेनला बाद करून सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. बुमराहने अंतिम सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना १८ धावांत २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. संपूर्ण स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर बुमराहने ८ सामन्यात एकूण १५ विकेट घेतल्या. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर राहिला.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : भारताच्या विजयानंतर जसप्रीत बुमराहलाही अश्रू अनावर; म्हणाला, “खेळानंतर सहसा रडत नाही पण भावना…”

रोहित शर्मा दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू –

टीम इंडियाने २००७ मध्ये पहिल्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर संघाची कमान एमएस धोनीच्या हातात होती. त्यानंतर भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. यावेळी दक्षिण आफ्रिकेची पाळी होती. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा रोहित शर्माही त्या संघाचा सदस्य होता. तेव्हापासून आतापर्यंत रोहित शर्मा प्रत्येक टी-२० विश्वचषक खेळला आहे, पण चॅम्पियन होऊ शकला नाही. पण आता तब्बल ११ वर्षांनंतर त्याला हा दिवस पाहण्याची संधी मिळाली आहे. टी-२० विश्वचषक दोनदा जिंकणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी तो केवळ खेळाडू म्हणून खेळला होता, मात्र यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषक जिंकला आहे.