टी-२० विश्वचषक २०२२ मधील दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला टी-२० विश्वचषकातून बाहेर पडाले लागले. भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारताच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानी सांगितले की टीम इंडियाने आशिया चषक २०२२ प्रमाणेच या स्पर्धेतही कामगिरी केली. चोप्रा म्हणाला की, ग्रुप स्टेजमध्ये भारताला फक्त दोन मोठे सामने मिळाले आणि एक सामना बाकी होता, पण यापैकी दोन सामने टीम हरली.

आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हणाला, “सर्वप्रथम तुम्ही पाकिस्तान, नेदरलँड्स, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काहीही केले असो, परंतु हा तो सामना होता जेव्हा तुम्हाला हे दाखवायचे होते की, तुम्ही त्यासाठी वर्षभर तयारी केली आहे. असा हा सामना होता. जिथे तुम्हाला सपाट खेळपट्टीवर फलंदाजी करायची होती. तुम्हाला माहित आहे की समोरच्या संघाची फलंदाजीमध्ये खोली आहे, पण गोलंदाजी कमकुवत आहे.

hamas leader yahya sinwar
विश्लेषण: याह्या सिनवारच्या हत्येनंतर गाझामध्ये युद्धविरामाची शक्यता किती? इस्रायलसाठी मोठा विजय?
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
The University of Oxford announced its new chancellor candidates on Wednesday
‘ऑक्सफर्ड’च्या प्रमुखपदाच्या शर्यतीत तीन भारतीय,अंतिम ३८ जणांची घोषणा; इम्रान खान यांचे नाव वगळले
MS Dhoni new look photo viral
MS Dhoni : ‘तपकिरी केस, हिरवा चष्मा आणि हलकी दाढी’, माहीच्या नव्या लूकने चाहत्यांना लावले वेड, फोटो व्हायरल
Rashtriya Swayamsevak Sangh Marks 100 Years Dasara Melva 2024 Nagpur
RSS Marks 100 Years : इस्रायल आणि हमास युद्धाचे जगावर काय परिणाम होतील? मोहन भागवत म्हणाले, “अहंकारातून हा प्रकार…”
Sanjay Manjrekar comment created Controversy face the taunt of Mumbai lobby
‘उत्तरेकडील खेळाडूंकडे मी फारसे लक्ष…’, संजय मांजरेकर वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल; चाहते म्हणाले, ‘मुंबई लॉबी…’
KL Rahul Reveals How Rohit Sharma Clear Message Revived Hopes in Team India for Victory in IND vs BAN
IND vs BAN: “रोहितचा मेसेज स्पष्ट होता, आऊट झालो तरी हरकत नाही, पण…”, केएल राहुलने सांगितला कर्णधाराचा प्लॅन
hasan hasarallah death effect on india
हिजबुल प्रमुखाच्या हत्येनंतर संघर्ष पेटणार? भारतासह इतर देशांवर काय परिणाम होणार?

तो पुढे म्हणाला, “ही २०० धावांची खेळपट्टी होती आणि आम्ही १६८ धावांवर थांबलो. तरीही, आम्ही तिथे पोहोचलो, कारण ६ षटकात ३८ धावा होत्या. तो साचा कुठे आहे, कारण तुम्ही एक चेंडू खेळलात. तू एक चेंडू खेळलास. सुरुवातीपासूनच आक्रमणाचा दृष्टिकोन ठेवण्यासाठी वर्षभर तयारी केली होती, पण ती इथे दिसली नाही. अख्खा विश्वचषक सोडा, हा सामना बघा, या सामन्याची तयारी केली होती.

आकाश पुढे म्हणाला, “तुम्हाला जे शेवटच्या क्षणी करायचे होते ते तुम्ही करू शकला नाही, तर तो हेतू कुठे गेला. जर ते वर्चस्व नसेल, तर तुम्ही खेळ कसा बदलू शकता. दुसरा माझ्या निवडीचा मुद्दा आहे. आशिया चषक २०२२ मध्ये दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यात कोण खेळणार हे तुम्हाला माहीत असावे. माहीत नसेल तर द्विपक्षीय मालिकेत कळायला हवे होते.”

हेही वाचा – T20 World Cup 2022: नासिर हुसेनची भारतीय संघावर टीका; म्हणाला, ‘भारतीय संघ अजून जुन्या पध्दतीनेच…..!’

चोप्रा म्हणाला, ”तुम्ही ऑस्ट्रेलियात सराव सामने खेळलात तर तुम्हाला तिथे कळले असते, पण नाही. लेगस्पिनरची धुलाई करेन, असा विचार करून तुम्ही ऋषभ पंतला खेळवले. पण तो कुठे खेळणार याचा आत्मविश्वास दिला नाही. तुम्ही त्याला शेवटी पाठवले, जेव्हा फिरकीपटू निघून गेले, कारण अशा फलंदाजाने मधल्या षटकांमध्ये खेळायला हवे.”