टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये चित्तथरारक असा सामना झाला. या सामन्यात शेवट्या काही मिनिटामध्ये क्रिकेट चाहत्यांना खेळाचा थरार अनुभवता आला. यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला १२० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान विजयाच्या जवळ आला होता. मात्र, भारतीय संघांच्या फलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानचा पराभव झाला आणि भारताने पाकिस्तानवर ६ धावांनी शानदार विजय मिळवला.

रविवारी रात्री ८ वाजता सुरू झालेला हा सामना मध्यरात्री संपला. ऋषभ पंतने साकारलेली ४२ धावांची खेळी, तीन भन्नाट झेल आणि जसप्रीत बुमराहने शिस्तबद्ध माऱ्यासह पटकावलेल्या ३ विकेट्स या विजयाचं वैशिष्ट्य ठरल्या. भारतीय संघाने विजयासाठी १२० धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, भारतीय संघाने शानदार बॉलिंग करत पाकिस्तानला २० ओव्हरमध्ये ११३ धावांवर रोखलं. त्यामुळे भारताने पाकिस्तानवर चित्तथरारक असा विजय मिळवला.

Varun Chakaravarthy trains with ODI squad in Nagpur ahead of India vs England series
IND vs ENG: भारताचा मिस्ट्री स्पिनर अचानक इंग्लंडविरूद्ध वनडे संघात दाखल, BCCIने केलं जाहीर; कसा आहे संपूर्ण संघ?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Jos Buttler Takes Dig at India After Pune Concussion Substitue of Harshit Rana in IND vs ENG
IND vs ENG: जोस बटलरने नाणेफेकीदरम्यान भारताला लगावला सणसणीत टोला, हर्षित राणाच्या मुद्द्यावरून पुन्हा सुनावलं
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Harshit Rana makes T20I debut as concussion substitute against England
IND vs ENG: हर्षित राणाचं चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान अनोखं पदार्पण, पहिल्याच षटकात घेतली विकेट; नेमकं काय घडलं?
U19 Eng vs SA bizarre run out as Aaryan Sawant video viral
U19 ENG vs SA : धक्कादायक! विचित्र रनआऊटच्या नादात थोडक्यात वाचला फिल्डर, VIDEO होतोय व्हायरल
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : IND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवाचं नेमकं कारण काय? बाबर आझम म्हणाला, “भारताविरुद्धच्या सामन्यात आम्ही…”

टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमधील हा अटीतटीचा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. हा सामना ज्या स्टेडियमवर झाला त्याविषयी चर्चा करताना भारताचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनीही प्रतिक्रिया दिली. “अशा खेळपट्टीवर बाबर आझमसारख्या खेळाडूची फलंदाजी थांबते हे खरे आहे. तुम्हाला अशा खेळपट्टीवर सातत्य हवे असते. मात्र, ते सातत्य पाकिस्तानच्या संघामध्ये दिसत नाही.”, असं माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी म्हटलं.

कर्णधार बाबर आझम काय म्हणाला?

पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमने यावर प्रतिक्रिया देत या पराभवाचे कारण सांगितलं आहे. जास्त डॉट बॉल खेळल्यामुळे पराभव झाल्याचं कारण कर्णधार बाबर आझमने सांगितलं आहे. कर्णधार बाबर आझम म्हणाला, “आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण फलंदाजी करत असताना आम्ही विकेट गमावल्या. त्यात अनेक डॉट बॉल खळलो. त्यामुळे आम्हाला विजयापर्यंत पोहतचा आले नाही. आम्ही सामान्यपणे खेळण्यासाठी डावपेच सोपे होते. स्ट्राइक रोटेशन आणि चौकार मारण्याची योजना होती. पण याचवेळी खूप डॉट बॉल्स खळलो, त्यामुळे विजयापर्यंत जाता आलं नाही. तसेच विकेट गेल्यामुळे चांगली कामगिरी करता आली नाही. यामध्ये शेवटच्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा ठेवता येत नाहीत”, अशी बाबर आझमने प्रतिक्रिया दिली

Story img Loader