टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास गुरुवारी उपांत्य फेरीत संपला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून पराभव झाला. हा पराभव भारतीय खेळाडू आणि समर्थकांसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पराभवानंतर सहकारी खेळाडू आणि चाहत्यांसाठी एक संदेश लिहिला आहे.

हार्दिकने त्याच्या ट्विटरवर काही फोटो शेअर करताना एक मेसेज लिहिला आहे. तो म्हणाला, ”निराश आहे, दुखावलो आहे, धक्का बसला आहे. हा निकाल स्वीकारणे आपल्या सर्वांसाठी कठीण आहे. मी माझ्या सहकारी खेळाडूंसोबतच्या नात्याचा आनंद लुटला आहे. आम्ही प्रत्येक टप्प्यावर एकमेकांसाठी लढलो. आमच्या समर्थन कर्मचार्‍यांच्या अनेक महिन्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल धन्यवाद.”

Kitchen Jugaad video | How to Pack Your Masala Box Perfectly After Opening
Kitchen Jugaad : मसाल्याचा बॉक्स उघडल्यानंतर कसा पॅकबंद करावा? VIDEO पाहा अन् जाणून घ्या भन्नाट ट्रिक
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Hardik Pandya No look shot video viral during India vs Bangladesh 1st T20 Match
Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या No Look शॉटने चाहत्यांना लावलं वेड, VIDEO होतोय तुफान व्हायरल
Sanjay Manjrekar comment created Controversy face the taunt of Mumbai lobby
‘उत्तरेकडील खेळाडूंकडे मी फारसे लक्ष…’, संजय मांजरेकर वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल; चाहते म्हणाले, ‘मुंबई लॉबी…’
Cost of veg thali increased 11 percent in Sept
कांदे, बटाटे, टोमॅटोचे भाव वाढल्याने सप्टेंबरमध्ये शाकाहार महागला!
Indian Cricket Team Played Foot Volley Match After Returning to Hotel On IND vs BAN
IND vs BAN: दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द होण्यापूर्वी टीम इंडियाने हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काय केलं? दिनेश कार्तिकने शेअर केला VIDEO
elon musk remove block function
मस्क यांचा नवीन निर्णय; ‘एक्स’वर एखाद्याला ब्लॉक केल्यानंतरही दिसणार पोस्ट, काय आहेत धोके?
IND vs BAN Rohit Sharma got trolled on social media
IND vs BAN : ‘चुकीच्या प्रकारातून निवृत्त झालास…’, चेन्नई कसोटीत अपयशी ठरल्यावर रोहित शर्मा होतोय ट्रोल

सध्याचा विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळला जात आहे, पण चाहत्यांनी स्टेडियममध्ये जाऊन भारतीय संघाला जोरदार पाठिंबा दिला. भारत जिथे-जिथे सामना खेळला, तिथले स्टेडियम संघाच्या समर्थकांनी भरलेली होती. अशा परिस्थितीत हार्दिकने त्याच्या चाहत्यांचे देखील आभार व्यक्त केले आहेत.

हेही वाचा – Team India: विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारताचे ‘हे’ सात खेळाडू परतणार मायदेशी, बाकीचे न्यूझीलंड दौरा करणार

हार्दिक पांड्या आपल्या चाहत्यांसाठी म्हणाला की, ”आमच्या चाहत्यांसाठी ज्यांनी आम्हाला सर्वत्र साथ दिली, आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. असे व्हायला नको होते, पण आपण त्यात लक्ष घालू आणि संघर्ष सुरूच ठेवू.”

उपांत्य फेरीच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर इंग्लंडने भारतावर १० विकेट्स राखून मात केली. त्यांनी १६९ धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत ७ बाद १६८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये हार्दिकने ३३ चेंडूत ६३ धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी विराट कोहलीने ५० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने १६ षटकात बिनबाद १७० धावा केल्या. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार जोस बटलरने ४९ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या.