IND vs ENG Rohit Sharma Tells Why India Lost: टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आज टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी ८० व ८६ धावांवर नाबाद राहून १० गडी राखून टीम इंडियाला पराभूत केले आहे. या लाजिरवाण्या पराभवावरून भारतीय संघावर टीका होत असताना कर्णधार रोहित शर्मा याने थोडक्यात आजच्या खेळावर स्पष्टीकरण दिले आहे. रोहित शर्माने आजच्या खेळात आपल्यासहीत संघाला ताण नीट हाताळता आला नाही त्यामुळेच खेळावर परिणाम झाल्याचे सांगितले आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, “तुम्ही जाऊन लोकांना दडपण कसे हाताळायचे हे शिकवू शकत नाही. संघातील बरेच लोक आयपीएलमध्ये दडपणाखाली खेळतात आणि त्यापैकी काही ते हाताळू शकतात. जेव्हा बाद फेरीचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही मन किती शांत ठेवून खेळू शकता हे पाहणे महत्त्वाचे असते.”

Dinesh Karthik Statement on Gautam Gambhir as Virat Kohli Bats at no 3 and loses wicket IND vs NZ
IND vs NZ: “मी गंभीरच्या विचारांशी सहमत नाही की…”, दिनेश कार्तिक विराट कोहलीमुळे भारताच्या कोचबद्दल अचानक असं का म्हणाला?
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
hamas leader yahya sinwar
विश्लेषण: याह्या सिनवारच्या हत्येनंतर गाझामध्ये युद्धविरामाची शक्यता किती? इस्रायलसाठी मोठा विजय?
Rohit Sharma Statement on Mohammed Shami Injury Said We Dont Want to Bring Injured Shami to Australia
Rohit Sharma on Mohammed Shami: “शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणं शक्य नाही…”, रोहित शर्माने मोहम्मद शमीबद्दल केलं मोठं वक्तव्य, कर्णधार नेमकं काय म्हणाला?
59-year-old man fell in one side love with 17-year-old girl and hit bike due to rejection
५९ वर्षीय वृद्धाचे १७ वर्षीय तरुणीवर जडले एकतर्फी प्रेम, प्रेमापोटी केले असे काही की…
newly married girl loksatta article
इतिश्री : वैचारिक सीमोल्लंघन
KL Rahul Reveals How Rohit Sharma Clear Message Revived Hopes in Team India for Victory in IND vs BAN
IND vs BAN: “रोहितचा मेसेज स्पष्ट होता, आऊट झालो तरी हरकत नाही, पण…”, केएल राहुलने सांगितला कर्णधाराचा प्लॅन
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!

भारताचा दारुण पराभव! पाकिस्तान व न्यूझीलंडनेही टीम इंडियाला असाच दिला होता धक्का, ‘हा’ योगायोग आठवतोय का?

रोहितने पुढे आजच्या सामन्यातील चुकांवर स्पष्टीकरण देत सांगितले की, “आजच्या सामन्यात भारताची गोलंदाजांची फळी कमकुवत ठरली आणि हाच दोन्ही संघांमधील मुख्य फरक ठरला. फलंदाजीतही चुका झाल्याचं पण भारताने उभे केलेले टार्गेट इतकेही वाईट नव्हते मात्र गोलंदाजीत संघ पूर्ण फसला. ज्या प्रकारे गोलंदाजीची सुरुवात झाली तेव्हाच आम्ही थोडे घाबरलो होतो. भुवीला सामन्यात कुठेतरी विकेट घेता येईल अशी आमची इच्छा होती. अॅडलेडच्या मैदानात कुठे धावा घेता येतात हे आम्हाला माहीत होते, आम्ही त्याबद्दल बोललो, पण तसे झाले नाही.”

IND vs ENG: मोहम्मद शमीचा नको ‘तो’ स्टंट नडला; रोहित शर्मा भरमैदानातच.. पाहा Video

दरम्यान, आजच्या सामन्यानंतर पाकिस्तानसह आता इंग्लंड विश्वचषक अंतिम सामना खेळणार हे निश्चित झाले आहे. रविवारी, १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.