टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील सुपर १२ च्या आपल्या अंतिम सामन्यामध्ये भारताने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी मात करुन दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला. विशेष म्हणजे नेदरलँड्सने सुपर-१२ फेरीमधील सर्वात मोठा धक्का आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये दिला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवल्याने भारत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता. फक्त भारत दुसऱ्या स्थानी असेल की पहिल्या हे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून होतं. भारताने दुसऱ्या गटात पहिलं स्थान कायम राखल्यामुळे आता दुसऱ्या गटामधून भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. पाकिस्तानने ‘सुपर १२’ मधील आपल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशवर गडी पाच राखून विजय मिळवला. क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे पुढील रविवारी कदाचित भारत विरुद्ध पाकिस्तान अशी ड्रीम फायनल्स पाहण्याची संधी मिळू शकते. नेमका भारत आणि पाकिस्तान टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमने-सामने कसे येऊ शकतात आणि आकडेवारी काय सांगते पाहूयात…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा