काल म्हणजेच १० नोव्हेंबरला झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यात भारताला लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. अनेक क्रिकेटप्रेमींना यंदाच्या टी२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहायचा होता. मात्र भारताच्या अत्यंत वाईट प्रदर्शनामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. या सामान्यानंतर भारताच्या खराब प्रदर्शन आणि रोहित शर्माच्या कप्तानीवर अनेकजण टीका करत आहेत. त्यातच आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही भारताच्या खेळीवर वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. नुकतंच पाकिस्ताचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने भारताच्या निराशाजनक पराभवावर भाष्य केले आहे.

आयसीसी टी२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताच्या निराशाजनक पराभवाच्या पार्श्वभूमीवर वसीम अक्रम याने आयपीएलवर टीका केली आहे. त्याच्या मते भारतातील तरुण वेगवान गोलंदाजांचे करिअर आयपीएलमुळेच उध्वस्त होत आहे. यादरम्यान त्याने आवेश खान याचे उदाहरण देत सांगितले की आयपीएलचे एक सीजन खेळल्यानंतर वेगवान गोलंदाज आपला वेग गमावतात.

How India Were All Out For 46 Rohit Sharma Decision of Batting First After Winning Toss Promoting Virat Kohli at No 3 IND vs NZ
IND vs NZ: भारताच्या वाताहतीला ‘हे दोन’ निर्णय कारणीभूत, रोहित शर्माच्या निर्णयाचा बसला मोठा फटका, तर विराट…
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Pakistan A Cricket Team Captain Mohammed Haris Sensational Revelation Said Banned From Talking About India Emerging Asia Cup IND vs PAK
IND vs PAK: “भारताबद्दल बोलण्यावर बंदी…”, पाकिस्तानच्या कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पाहा नेमकं काय म्हणाला?
IND W vs PAK W match Harmanpreet Kaur Injury Video viral
Harmanpreet Kaur : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या मानेला गंभीर दुखापत, VIDEO व्हायरल
Virat Kohli Behind Babar Azam Pakistan Captaincy Resign Pak Media Reveals Inside Story
Babar Azam: विराट कोहलीमुळे बाबर आझमने कर्णधारपदाचा दिला राजीनामा? पाकिस्तानी पत्रकाराच्या पोस्टने चाहते आश्चर्यचकित
Pakistan test captain Shan Masood on Virat Kohli
VIDEO : ‘विराटपेक्षा ‘या’ २४ वर्षीय खेळाडूचा रेकॉर्ड चांगला…’, पाकिस्तानच्या कसोटी कर्णधाराचे वक्तव्य
KL Rahul Reveals How Rohit Sharma Clear Message Revived Hopes in Team India for Victory in IND vs BAN
IND vs BAN: “रोहितचा मेसेज स्पष्ट होता, आऊट झालो तरी हरकत नाही, पण…”, केएल राहुलने सांगितला कर्णधाराचा प्लॅन
IND vs PAK Mudassar Nazar says match-fixing incident cannot be repaired.
‘पाकिस्तान भारताकडून हरला की मॅच फिक्सिंगचे आरोप व्हायचे…’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

T20 World Cup Semi Final: “ते त्या लायकीचे नव्हतेच” पराभवानंतर शोएब अख्तरने उडवली भारतीय संघाची खिल्ली

ए स्पोर्ट्सच्या द पॅव्हेलियन शोमध्ये वसीम म्हणाला, “मी भारतीय वेगवेगवान गोलंदाजांबद्दल एका गोष्टीची नोंद केली आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, भारताचा आवेश खानसारखा एक गोलंदाज, तो १४५ किमी प्रतितास या वेगाने गोलंदाजी करायचा. तसेच त्याचा १४०पेक्षा जास्त कन्सिस्टन्सी रेट होता. मात्र आयपीएलचे एक सीजन खेळल्यानंतर त्याचा हा वेग १३० किमी प्रतितासावर आला. एक सीजन खेळल्यावरच त्याच्या वेगामध्ये कमालीची घट झाली.”

तसेच, वसीम पुढे म्हणाला की, “२००८ मध्ये आयपीएल सुरु झाल्यावर सर्वांनाच असे वाटले होते की याचा भारताला खूपच चांगला फायदा होईल. मात्र तसे झालेले दिसले नाही. २००७ साली भारताने ती टी२० विश्वचषक जिंकला. पण आयपीएल सुरु झाल्यापासून भारताने एकदाही ही ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे प्रश्न पडतो, की परदेशातील लीग खेळण्याची परवानगी दिल्यास भारताचा दृष्टिकोन बदलेल का?”