भारताचा माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाणनने टी-२० विश्वचषक स्पर्धेसंदर्भात एक रोखठोक मत व्यक्त केलं आहे. भारताला आपल्या अंतिम सामन्यामध्ये झिम्बाब्वेला पराभूत करता आलं नाही तर भारतीय संघ उपांत्यफेरीमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरत नाही असं पठाणने म्हटलं आहे. विशेष म्हणजे हा सामना पराभूत झाल्यास भारताच्या उपांत्यफेरीच्या आशा पूर्णपणे संपणार नसून नेट रन रेटवर अव्वल दोन संघ कोण असतील हे निश्चित होईल. असं असतानाही झिम्बाब्वेविरुद्धचा सामना हरल्यास भारत खरोखरच उपांत्यफेरीत खेळण्यासाठी लायक संघ नाही असं पठाणने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Zim: शेवटच्या सामन्यात पाऊस पडला तर…; पाकिस्तानपेक्षा कमी नेट रन रेट असल्याने भारत स्पर्धेबाहेर पडणार की…

IND vs BAN Test Series updates in marathi
IND vs BAN : भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ जाहीर! हत्येचा आरोप असणारा खेळाडू संघात कायम
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
IND vs BAN Team India squad announced for 1st match against bangladesh
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
Icc test rankings updates in marathi
Test Rankings : ICC ची ताजी कसोटी क्रमवारी जाहीर! यशस्वी जैस्वालला फायदा तर बाबर आझमला बसला मोठा फटका
World Test Championship 2025 How Pakistan Qualify for Final Match
PAK vs BAN: बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो? काय आहे समीकरण?
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक

रविवारी सुपर १२ फेरीमधील भारताचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. मेलबर्नलच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार असून उपांत्यफेरीत पात्र ठरण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. हा सामना जिंकल्यास भारत गट फेरीमध्ये आपलं पहिलं स्थान निश्चित करेल. मात्र याच जवळजवळ करो या मरो स्थितीमधील सामन्याबद्दल बोलताना इरफान पठाणने आपलं स्पष्ट मत मांडलं. स्टार स्फोर्ट्सवरील टॉक शोमध्ये फरफानने हा सामना पराभूत झाल्यास भारत उपांत्यफेरीच्या दर्जाचा संघ नसेल असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: नेट रन रेटवर पाकिस्तान In की Out ठरणार? पण NRR कॉलमखाली दिसणारा ‘नेट रन रेट’ म्हणजे काय? तो कसा मोजतात?

“तुम्ही जर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पराभूत होत असाल तर तुम्ही खरोखरच उपांत्यफेरीमध्ये खेळण्याच्या लायक नाही, असं मला वाटतं. सध्याच्या झिम्बाब्वेच्या संघाची गोलंदाजी उत्तम असली तरी त्यांची फलंदाजी फारशी प्रभावी नाही. त्यामुळे हा सामना मोठ्या फरकाने जिंकला पाहिजे,” असं पठाणने म्हटलं आहे. पठाणने हा सामना भारताने हलक्यात घेता कामा नये असाही सल्ला रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला दिला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने निसटता विजय मिळवल्याचा संदर्भ पठाणने हे विधान करताना दिला.

नक्की वाचा >> Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…

“बांगलादेशविरुद्धचा सामना आपण पाहिला. तो फारच अटीतटीचा सामना झाला. पाऊस पडला नसता तर सामना बांगलादेशच्या बाजूने फिरला असता आणि ते सामना जिंकलेही असते. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे,” असं पठाणने म्हटलं आहे.