Team India record in ICC T20 World Cup history : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला २ जून पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ आधीच अमेरिकेत पोहोचला असून संघाने सरावही सुरू केला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात १ जून रोजी सराव सामना खेळवला जाणार आहे. यानंतर टीम इंडियाचा विश्वचषकातील सामना ५ जूनला आयर्लंडशी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ९ जून रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे. टी-२० विश्वचषकाचे आतापर्यंत ८ हंगाम खेळले गेले आहेत. टीम इंडियाने २००७ मध्ये पहिल्यांदा आणि शेवटचा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. या स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास कसा राहिला ते जाणून घेऊया.

भारताने पदार्पणाच्या हंगामात जिंकला होता विश्वचषक –

टी-२० विश्वचषक स्पर्धेला २००७ साली सुरूवात झाली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफीवर नाव कोरले होते. भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता. पुढच्याच हंगामात २००९ मध्ये भारतीय संघ सुपर-८ मध्ये पोहोचला. या हंगामात पाकिस्तानने विजेतेपद पटकावले होते. २०१० च्या टी-२० विश्वचषकातही टीम इंडियाने सुपर-८ पर्यंतचा प्रवास केला होता.

Loksatta explained Where exactly did the Indian women team go wrong How affected by the failure of Smriti Mandhana
जेतेपदाचे ध्येय, पण साखळीतच गारद! भारतीय महिला संघाचे नेमके चुकले कुठे? स्मृती मनधानाच्या अपयशाचा कितपत फटका?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
NZ W vs AUS W Match Highlights Australia beat New Zealand
NZ W vs AUS W : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय, भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग झाला खडतर
International Masters League 2024 Updates in Marathi
IML 2024 : सचिन-लारासह ‘हे’ दिग्गज पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज! ‘या’ लीगमध्ये होणार सहभागी
IND W vs NZ W Run Out Controversy as Umpires Give Dead Ball After Harmanpreet Kaur Runs Amelia Kerr
IND W vs NZ W: भारताबरोबर पहिल्याच सामन्यात झाली चिटिंग, पंचांच्या चुकीमुळे भारताने गमावली विकेट, हरमनप्रीत-कोच भडकले, VIDEO व्हायरल
batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
T20 World Cup INDW beat WIW by 20 Runs in Womens World Cup Warm Up Match
Women’s T20 World Cup: T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची जोरदार तयारी, पहिल्या सराव सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनचा केला पराभव; जेमिमा-पूजाची चमकदार कामगिरी
What is the Irani Cup competition in domestic cricket and what is its history
इराणी कप हे नाव स्पर्धेला कसं मिळालं? जाणून घ्या भारतीय क्रिकेटच्या प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेचा संपूर्ण इतिहास

वेस्ट इंडिजकडून पत्करावा लागला होता पराभव –

२०१२ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडिया फक्त सुपर-८ पर्यंत पोहोचू शकली होती. यानंतर २०१४ मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मेन इन ब्लूचा ५व्या हंगामात चांगला प्रवास होता आणि संघाने अंतिम फेरी गाठली. मात्र, निर्णायक सामन्यात श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. टी-२० वर्ल्ड कपच्या सहाव्या मोसमात टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये धडक मारण्यात यश आले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा ७ विकेट्सने पराभव करत विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात आणले.

हेही वाचा – IND vs BAN Live Streaming: भारत-बांगलादेश सराव सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

टी-२० विश्वचषक २०२१ मधील कामगिरी लाजिरवाणी राहिली –

टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होती. कारण संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. या हंगामात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा पराभव करून ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर फेकले.

हेही वाचा – ENG vs PAK 4th T20 : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा विक्रम, इंग्लंडविरुद्ध केला ‘हा’ खास पराक्रम

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी :

टी-२० विश्वचषक २००७: भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले
टी-२० विश्वचषक २००९: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर पडली
टी-२० विश्वचषक २०१०: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर पडली
टी-२० विश्वचषक २०१२: टीम इंडिया सुपर ८ मध्ये गेली पण उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला नाही.
टी-२० विश्वचषक २०१४: टीम इंडिया अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभूत झाली.
टी-२० विश्वचषक २०१६: टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला पण वेस्ट इंडिजकडून पराभव झाला
टी-२० विश्वचषक २०२० (२१): टीम इंडिया सुपर १२ मधून बाहेर पडली.
टी-२० विश्वचषक २०२२: टीम इंडिया उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर बाहेर पडली.