Team India record in ICC T20 World Cup history : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला २ जून पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ आधीच अमेरिकेत पोहोचला असून संघाने सरावही सुरू केला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात १ जून रोजी सराव सामना खेळवला जाणार आहे. यानंतर टीम इंडियाचा विश्वचषकातील सामना ५ जूनला आयर्लंडशी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ९ जून रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे. टी-२० विश्वचषकाचे आतापर्यंत ८ हंगाम खेळले गेले आहेत. टीम इंडियाने २००७ मध्ये पहिल्यांदा आणि शेवटचा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. या स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास कसा राहिला ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने पदार्पणाच्या हंगामात जिंकला होता विश्वचषक –

टी-२० विश्वचषक स्पर्धेला २००७ साली सुरूवात झाली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफीवर नाव कोरले होते. भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता. पुढच्याच हंगामात २००९ मध्ये भारतीय संघ सुपर-८ मध्ये पोहोचला. या हंगामात पाकिस्तानने विजेतेपद पटकावले होते. २०१० च्या टी-२० विश्वचषकातही टीम इंडियाने सुपर-८ पर्यंतचा प्रवास केला होता.

वेस्ट इंडिजकडून पत्करावा लागला होता पराभव –

२०१२ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडिया फक्त सुपर-८ पर्यंत पोहोचू शकली होती. यानंतर २०१४ मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मेन इन ब्लूचा ५व्या हंगामात चांगला प्रवास होता आणि संघाने अंतिम फेरी गाठली. मात्र, निर्णायक सामन्यात श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. टी-२० वर्ल्ड कपच्या सहाव्या मोसमात टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये धडक मारण्यात यश आले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा ७ विकेट्सने पराभव करत विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात आणले.

हेही वाचा – IND vs BAN Live Streaming: भारत-बांगलादेश सराव सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

टी-२० विश्वचषक २०२१ मधील कामगिरी लाजिरवाणी राहिली –

टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होती. कारण संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. या हंगामात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा पराभव करून ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर फेकले.

हेही वाचा – ENG vs PAK 4th T20 : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा विक्रम, इंग्लंडविरुद्ध केला ‘हा’ खास पराक्रम

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी :

टी-२० विश्वचषक २००७: भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले
टी-२० विश्वचषक २००९: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर पडली
टी-२० विश्वचषक २०१०: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर पडली
टी-२० विश्वचषक २०१२: टीम इंडिया सुपर ८ मध्ये गेली पण उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला नाही.
टी-२० विश्वचषक २०१४: टीम इंडिया अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभूत झाली.
टी-२० विश्वचषक २०१६: टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला पण वेस्ट इंडिजकडून पराभव झाला
टी-२० विश्वचषक २०२० (२१): टीम इंडिया सुपर १२ मधून बाहेर पडली.
टी-२० विश्वचषक २०२२: टीम इंडिया उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर बाहेर पडली.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lets know how the performance of team india has been in the history of icc t20 world cup vbm
Show comments