Rohit Sharma Virat Kohli Viral Video of T20WC 2024 Final: टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यातील एक व्हीडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून सर्वच भारतीय चाहते पुन्हा एकदा भावूक झाले आहेत. भारतीय संघाने २९ जून रोजी झालेल्या टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद मिळवले. हा अंतिम सामना भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा अखेरचा टी-२० सामना ठरला. या सामन्यानंतर आणि भारताने टी-२० विश्वचषक पटकावल्यानंतर रोहित आणि विराटने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या होत असलेल्या या व्हायरल व्हीडिओवरून दोन्ही खेळाडूंना आपला अखेरचा टी-२० सामना असणार याची आधीच खात्री होती.

फायनलपूर्वीचा विराट-रोहितचा भावूक करणारा व्हीडिओ व्हायरल

अंतिम सामन्यात कोहलीने ७६ धावांची खेळी खेळली ज्यामुळे भारताला सामन्यात सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. दुसरीकडे, रोहित ९ धावा करत बाद झाला. विराट कोहली आणि रोहित शर्माचा व्हायरल व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली अंतिम सामन्यासाठी प्रथम फलंदाजीसाठी मैदानात जाताना दिसत आहेत. त्यानंतर दोघांनी एकमेकांना हात मिळवत मिठी मारली. शेवटचा टी-२० सामना खेळण्यापूर्वी खेळपट्टीवर पोहोचताच दोन्ही फलंदाज एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. ज्यात म्हटले की या दोन्ही फलंदाजांनी आधीच ठरवले होते की हा त्यांचा शेवटचा टी-२० सामना असेल. तर अनेकांनी म्हटलं की लाइव्ह सामना पाहताना आम्ही हा क्षण पाहण्याचं राहून गेलं.

India vs Bangladesh 1st T20I Match Updates in Marathi
IND vs BAN 1st T20 सामन्यापूर्वी ग्वाल्हेरमध्ये वाढवली सुरक्षा, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
‘आयपीएल’ मध्ये सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास मान्यता | Approval to retain six players in IPL sport news
‘आयपीएल’ मध्ये सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास मान्यता
ENG vs AUS Liam Livingstone smashed 28 runs in a over of Mitchell Starc video viral
IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा
Bangladesh super fan Tiger Robi claims he was assaulted by the Kanpur crowd on Day 1
Bangladesh Super Fan Beaten Up: कानपूर कसोटीदरम्यान बांगलादेशी चाहत्याला मारहाण? पत्रकार म्हणाले, “पहिल्या कसोटीतही त्याने सिराजला…”
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील
India grandmaster chess player D Gukesh expressed that he did not even think about it during the chess Olympiad sport news
ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान जगज्जेतेपदाच्या लढतीचा विचारही नाही -गुकेश
India Playing 11 Might Change for India vs Bangladesh Kanpur Test Kuldeep Yadav Yash Dayal to Get Chance IND vs BAN
IND vs BAN: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात होऊ शकतात दोन मोठे बदल, कानपूरच्या खेळाडूचे होणार पुनरागमन, वाचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

टीम इंडियाच्या विजयात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची महत्त्वाची भूमिका होती. कोहली संपूर्ण स्पर्धेत खराब फॉर्मशी झुंजत होता. पण जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर अंतिम सामन्यात ५९ चेंडूत ७६ धावा करून संघाला चॅम्पियन बनवले. या कामगिरीसाठी विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

दुसरीकडे, रोहित शर्माने या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. रोहितने ८ डावात २५७ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी ३६.७१ होती तर स्ट्राइक रेट १५६.७० होता. रोहित शर्मा हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने एक खेळाडू म्हणून दोन टी-२० विश्वचषक जिंकली आहेत. याआधी त्याने धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ चे विजेतेपदही पटकावले होते.