Rohit Sharma has become 1st Indian player to win T20 World Cup twice for Team India : रोहित शर्माने आज क्रिकेट विश्वात इतिहास रचला. आजपर्यंत भारताच्या कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती, जी आता हिटमॅन रोहित शर्माने केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने अखेर टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पुन्हा एकदा विश्वविजेते होण्याचा बहुमान मिळवला आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर भारतीय संघाने ११ वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवला.

रोहित शर्मा दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू –

टीम इंडियाने २००७ मध्ये पहिल्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर संघाची कमान एमएस धोनीच्या हातात होती. त्यानंतर भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. यावेळी दक्षिण आफ्रिकेची पाळी होती. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा रोहित शर्माही त्या संघाचा सदस्य होता. तेव्हापासून आतापर्यंत रोहित शर्मा प्रत्येक टी-२० विश्वचषक खेळला आहे, पण चॅम्पियन होऊ शकला नाही. पण आता तब्बल ११ वर्षांनंतर त्याला हा दिवस पाहण्याची संधी मिळाली आहे. टी-२० विश्वचषक दोनदा जिंकणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी तो केवळ खेळाडू म्हणून खेळला होता, मात्र यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषक जिंकला आहे.

Abhishek Sharma Highest T20I Score for India 135 Runs Breaks Many Records IND vs ENG 5th T20I
IND vs ENG: अभिषेक शर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये कोणत्याच भारतीय फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
India vs England 4th T20 Highlights in Marathi
India vs England 4th T20I Highlights: हर्षित राणाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, सलग पाचव्या टी-२० मालिकेत इंग्लडला चारली धूळ
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
ICC Announces T20 Team of The Year 2024 Indias Rohit Sharma Named Captain of Squad
ICC T20I Team of The Year: ICC ने जाहीर केला सर्वाेत्कृष्ट टी-२० संघ २०२४, रोहित शर्मा कर्णधार; भारताच्या चार खेळाडूंना मिळाली संधी

११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला –

बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला उत्कृष्ट झेल निर्णायक ठरला. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर २०११ साली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

हेही वाचा – IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’ने सामन्याला दिली कलाटणी, ज्यामुळे भारताने ११ वर्षानंतर ICC ट्रॉफीवर कोरलं नाव, पाहा VIDEO

संपूर्ण स्पर्धेत रोहित शर्मा सर्वोत्तम फलंदाजी केली –

या टी-२० विश्वचषकात रोहित शर्माने आपल्या बॅटने दाखवलेली चमक पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील. होय, ही दुसरी बाब आहे की आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये त्याची बॅट फारशी तळपली नाही, पण उपांत्य फेरीत आणि त्याआधी कांगारू संघाविरुद्ध त्याच्या बॅटने आग ओकली होती. आज जेव्हा रोहितची बॅट चालली नाही तेव्हा त्याचा साथीदार विराट कोहलीने त्याची पोकळी भरून काढली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. चॅम्पियन बनल्यानंतर विराट कोहलीने स्पष्टपणे जाहीर केले की हा केवळ त्याचा शेवटचा टी-२० विश्वचषक नाही तर शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे. म्हणजेच विराट कोहलीने आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही.

Story img Loader