Rohit Sharma 1st player to play most T20 World Cup : टीम इंडियाने टी-२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवत टी-२० विश्वचषकातील आपला पहिला विजय नोंदवला. या सामन्यात रोहित शर्माने आयर्लंडविरुद्ध खेळायला उतरताच इतिहास रचला. खरं तर, तो टी-२० सलग नववा हंगाम खेळणारा पहिला फलंदाज ठरला. १९ सप्टेंबर २००७ रोजी डर्बन येथे इंग्लंडविरुद्ध त्याने टी-२० विश्वचषकात पदार्पण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत तो टी-२० विश्वचषकाच्या प्रत्येक हंगामाचा भाग आहे. कर्णधार म्हणून त्याचा हा दुसरा हंगाम आहे.

हा विक्रम फक्त दोन खेळाडूंच्या नावावर आहे –

रोहित व्यतिरिक्त, पहिल्या हंगामापासून टी-२० वर्ल्ड कपचा प्रत्येक हंगाम खेळणारा दुसरा खेळाडू बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसन आहे. मात्र, बांगलादेशचा संघ अद्याप यंदाच्या टी-२० विश्वचषकातील सामना खेळलेला नाही. त्यामुळे ही कामगिरी करणारा रोहित पहिला खेळाडू ठरला आहे. बांगलादेश ८ जूनला श्रीलंकेविरुद्ध आपल्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. शाकिब जेव्हा त्या सामन्यात खेळेल, तेव्हा ही कामगिरी करणारा तो रोहितनंतरचा दुसरा खेळाडू ठरेल.

Rohit Sharma Becomes the First Batsman to hit 600 Sixes in International Cricket
T20 WC 2024: रोहित शर्माच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
DCM Ajit Pawar
सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर ४८ तासांच्या आत अजित पवारांचा मोठा निर्णय, युगेंद्र पवारांना पहिला झटका
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Saurabh Netrawalkar Statement on Suryakumar Yadav Dropped Catch
IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’
Rishabh Pant Medical Time Out Delayed The Game with Perfect Move
T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

रोहित शर्माची टी-२० विश्वचषकातील कामगिरी –

रोहित शर्माने आतापर्यंत टी-२० विश्वचषकात एकूण ३६ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३४.३९ च्या सरासरीने ९६३ धावा केल्या आहेत. हिटमॅनने या काळात ९ अर्धशतकेही झळकावली आहेत. रोहित अजूनही या मेगा टूर्नामेंटमधील पहिल्या शतकाच्या शोधात आहे. जर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे, तर तो धावांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १५१ सामन्यांच्या १४३ डावांमध्ये ३,९७४ धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. रोहितने वर्ल्ड कपमध्ये ३७ सामने खेळले आहेत.

हेही वाचा – T20 WC 2024 : अरे हे काय! आऊट झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर ओमानच्या ड्रेसिंग रूमकडे निघाला, VIDEO होतोय व्हायरल

टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माने पूर्ण केल्या ४००० धावा –

आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात २६ धावा करत रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो विराट कोहली आणि बाबर आझमनंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीच्या टी-२० क्रिकेटमध्ये ४०३८ धावा आहेत, तर बाबर आझमने टी-२० मध्ये एकूण ४०२३ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने आपल्या १५२व्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर रोहितने सर्वात कमी चेंडू खेळून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने २८६१ चेंडूत ४००० धावांचा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा – IND vs IRE : रोहित शर्माने धोनीला मागे टाकत रचला इतिहास! ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार

रोहितने धोनीचा विक्रम मोडत रचला इतिहास –

रोहित शर्माने आतापर्यंत ५५ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. या काळात टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वाखाली ४३ सामने जिंकले आहेत. तर एमएस धोनीने ७२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले. या काळात त्याने ४२ सामने जिंकले होते. अशा परिस्थितीत या यादीत एमएस धोनीला मागे टाकत रोहित शर्माने इतिहास रचला आहे. तो भारतासाठी सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा चौथा कर्णधार ठरला आहे. या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम अव्वलस्थानी आहे.