Rohit Sharma Statement on India win: टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर८ फेरीतील सलग दुसरा सामना भारताने जिंकला आहे. भारताने अँटिगामध्ये झालेल्या सामन्यात बांगलादेशविरूद्ध ५० धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सर्वच फलंदाजांनी धावांची भर घालत भारताची धावसंख्या १९६ पर्यंत नेली. भारताच्या धावसंख्येत सर्वात मोठं योगदान हार्दिक पंड्याने दिलं. हार्दिकने झंझावाती अर्धशतक झळकावत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. तर रोहित शर्मा २३, विराट कोहली ३७, ऋषभ पंत ३६ आणि शिवम दुबे ३४ धावांचे योगदान दिले. या सहज मिळवलेल्या विजयानंतर रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

बांगलादेशचा ५० धावांनी पराभव करत सलग दुसऱ्या विजयासह उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला. या विजयासह भारताचे पहिल्या गटात दोन सामन्यातील दोन विजयांसह चार गुण झाले असून संघ अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया एका विजयासह दोन गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे.

Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Paralympics 2024 Navdeep Singh hug Beit Sayah Sadegh
Paralympics 2024 : सुवर्णपदक जिंकल्यानंतर नवदीप सिंगने केलं असं काही की… प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम
Ramiz Raja on PAK vs BAN Test
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘आशिया कपमध्येच भारताने पाकिस्तानची…’
PAK vs BAN Shakib Al Hasan Throw Ball on Mohammed Rizwan
PAK vs BAN: शकिब अल हसनने रागाच्या भरात मोहम्मद रिझवानला फेकून मारला चेंडू, पंचांनीही घेतला आक्षेप; पाहा VIDEO

हेही वाचा – IND v BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, या विजयासह टीम इंडियाने केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

भारताच्या विजयानंतर काय म्हणाला रोहित शर्मा

रोहित शर्मासह भारताच्या सर्वच फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. याबद्दल बोलतानाच रोहित म्हणाला, “मी बऱ्याच दिवसांपासून बॅटने आक्रमक खेळण्याबद्दल बोलत आहे. सर्व गोष्टींचा विचार करता, आम्ही परिस्थितीशी जुळवून घेत खरोखरच चांगले खेळलो. इथे वाऱ्याचा थोडासा प्रभाव आहे, एकूणच आम्ही खूप हुशारीने खेळत आहोत. एकूणच आम्ही बॅट आणि बॉलसह चांगली कामगिरी केली.”

हेही वाचा – VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!

यासह टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरवर रोहित शर्मा म्हणाला, “आठही फलंदाजांना त्यांची भूमिका चोख पार पाडायची आहे, मग काहीही होवो. आम्ही पाहिले की एका खेळाडूने ५० धावा केल्या आणि आम्ही १९६ धावा केल्या. माझ्या मते तरी टी-२० मध्ये अर्धशतके आणि शतके झळकावण्याची गरज नाही, तुम्ही गोलंदाजांवर किती दबाव टाकता हे महत्त्वाचे आहे. सर्व फलंदाज सुरुवातीपासून असेच खेळत आले आहेत आणि आम्हालाही असंच खेळत राहायचं आहे. संघात खूप अनुभवी खेळाडू आहेत आणि संघ त्यांना पाठिंबा देतो.”

हेही वाचा – ICC World Cup टूर्नामेंटचा ‘किंग’ ठरला विराट कोहली! विश्वचषकाच्या इतिहासात ही कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

हार्दिक पंड्याबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “गेल्या सामन्यातही मी म्हणालो की, त्याच्या चांगल्या फलंदाजीने संघाला चांगल्या स्थितीत आणले आहे. टॉप५,६ फलंदाजांनंतर सामन्याला एक चांगला फिनिश देण्याची गरज आहे, हार्दिक हा हार्दिक आहे, आम्हाला माहित आहे की तो काय करण्यास सक्षम आहे. तो संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, तो अशीच कामगिरी करत राहिल आणि संघाला एका चांगली धावसंख्या गाठण्यात मदत करेल.”