IND vs SA, T20 World Cup Finals Update: भारतीय क्रिकेट संघ शनिवारी, २९ जूनला टी २० विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात आठ महिन्यांनंतर दुसरा विश्वचषक अंतिम सामना, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. १९ नोव्हेंबरला २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. विद्यमान विश्वचषकाप्रमाणे त्याही वर्षी भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला होता, पण फायनल्समध्ये मोक्याच्या क्षणी भारताने सामना व चषक गमावला. आता T20 विश्वचषकाच्या २०२४ च्या अंतिम फेरीत प्रोटीज संघाचा सामना करताना आयसीसी विजेतेपदाच्या दुष्काळाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवण्याची आणखी एक संधी भारताला मिळाली आहे.

जेव्हा मी अध्यक्ष होतो, विराटला कर्णधारपदी राहायचं नव्हतं.. काय म्हणाला सौरव गांगुली?

पीटीआयशी बोलताना, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने जर आज भारत हरला तर रोहित शर्माची प्रतिक्रिया कशी असेल याविषयी भाष्य केलं आहे. गांगुली म्हणाला की, “भारत आजही फायनलमध्ये हरल्यास रोहित बार्बाडोसच्या महासागरात उडी घेईल. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची त्याची ही दुसरी वेळ आहे. त्याच्या उत्तम नेतृत्वाचं आणि कर्णधारपदी केलेल्या कमाल कामगिरीचं हे उदाहरण आहे. जेव्हा मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो आणि विराट कोहलीला कर्णधार राहायचं नव्हतं तेव्हा रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, मला तेव्हाही आश्चर्य वाटलं नव्हतं कारण रोहितवर मला विश्वास होता. उलट रोहितच कर्णधार होण्यासाठी तयार नव्हता त्याला तयार करण्यासाठी मध्ये खूप वेळही गेला, पण आता जेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रगती करतोय हे पाहून तेव्हा केलेले प्रयत्न सार्थकी लागले असे वाटतेय.”

Jasprit Bumrah Speaks To ICC Before IND vs SA Finals
बुमराह रोहित शर्माच्या कर्णधारपदावर उघडपणे बोलला; IND vs SA मॅचसाठी कमी वेळ मिळण्यावरून म्हणाला, “साध्या गोष्टी पण..”
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG
“बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट
IND vs ENG Match Highlights, Shoaib Akhtar Reaction
“हिंदुस्थान जिंकल्याचा मला..”, म्हणत शोएब अख्तरने पोस्ट केलेला Video चर्चेत; माजी पाक खेळाडूने विचारलं, “कुणी हा सल्ला..”
Rahul Dravid Makes Bold Prediction About Virat Kohli
IND vs SA T20 WC Finals: विराट कोहलीच्या भूमिकेबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, “काही मोठे बदल..”
Kapil Dev Remark On Virat Kohli & Rohit Sharma
“विराट कोहली १५० किलोचे डंबेल उचलतो, पण रोहित शर्माचा एक पॅक..”, कपिल देव यांचं मोठं विधान; म्हणाले, “मर्यादांची..”

आयपीएल जिंकणं खूप कठीण..

पुढे, गांगुली असंही म्हणाला की स्पर्धेच्या कालावधीमुळे आयपीएल विजेतेपद जिंकणे कधीकधी अधिक आव्हानात्मक असू शकते. “रोहितच्या नावावर पाच वेळा आयपीएल जेतेपदे जिंकण्याचा विक्रम आहे. ही अर्थातच मोठी कामगिरी आहे. मला चुकीचं समजू नका, मी असं म्हणत नाही की आयपीएल हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा चांगले आहे पण काही वेळा सलग होणारे सामने व स्पर्धेचा कालावधी लक्षात घेता आयपीएल जिंकणे अधिक कठीण असू शकते. तुम्हाला आयपीएल जिंकण्यासाठी १६- १७ (१२ -१३ ) सामने जिंकावे लागतात तर विश्वचषक जिंकण्यासाठी ८- ९ सामने जिंकावे लागतात. विश्वचषक जिंकणे हा अधिक मोठा सन्मान आहे, आणि मला आशा आहे की रोहितला यंदा तो सन्मान भारताला मिळवून देता येईल.”

..तर रोहित समुद्रात उडीच घेईल!

गांगुलीने टीमला आजच्या फायनलसाठी शुभेच्छा देत म्हटलं की, “रोहित शर्मा हा सात (सहा) महिन्यांच्या कालावधीत दोन विश्वचषक फायनल्स हातातून निसटू देईल असा कर्णधार वाटत नाही. तरीही जर भारत हरलाच तर मला वाटतं रोहितच बार्बाडोसच्या समुद्रात उडी घेईल. या वेळेस त्याने टीमचं नेतृत्व कुशलतेने केलं आहे. स्वतः उत्तम फलंदाजी केली आहे. मला आशा आहे की उद्या भारत तिन्ही बाजूंनी उत्तम खेळेल. त्यांनी जिंकावं यासाठी त्यांना खूप शुभेच्छा, त्यांना थोडी नशिबानेही साथ द्यायला हवी कारण असे सामने खेळण्यासाठी ते सुद्धा आवश्यक असतेच. “