आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मधील भारताच्या प्रवासाची सुरुवात जितकी नेत्रदीपक होती तितकीच ती समाप्त होणे वेदनादायक होते. भारताने पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना जिंकून चार गडी राखून सामना जिंकला होता. यानंतर टीम इंडियाने ग्रुप-२ मध्ये अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरी गाठली होती, मात्र १० नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध भारताला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव भारताला वर्षानुवर्षे डंखणार आहे. टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरला महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाची आठवण येऊ लागली.

या पराभवानंतर गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला, “कोणीतरी येईल, जो रोहित शर्मापेक्षा अधिक द्विशतके आणि विराट कोहलीपेक्षा जास्त शतके झळकावेल. पण कोणताही भारतीय कर्णधार तीन आयसीसी ट्रॉफी जिंकू शकेल असे मला वाटत नाही. टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ टी२० विश्वचषक, २०११ विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

IND vs BAN 3rd T20I Sanju Samson credited captain Suryakumar Yadav and coach Gautam Gambhir
IND vs BAN : ‘मी खूप वेळा अपयशी ठरलो आहे पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनच्या प्रतिक्रियेने टीम इंडियासह चाहत्यांची जिंकली मनं
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
New Zealand Beat Sri Lanka in Womens T20 World Cup 2024 Team India Semifinal Equation Goes Difficult
SL W vs NZ W: न्यूझीलंडच्या विजयाने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, सेमीफायनल गाठण्यासाठी आता फक्त एकच मार्ग!
Rohit Sharma Stops Car on Mumbai Busy Road and Wishes Female Fan on Her Birthday Video Goes Viral
Rohit Sharma: रोहित शर्माने चाहतीच्या वाढदिवसाचा आनंद केला द्विगुणित; दिली खास भेट; VIDEO व्हायरल
India vs Bangladesh 1st T20 Match highlights
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा
IND W vs PAK W match Harmanpreet Kaur Injury Video viral
Harmanpreet Kaur : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या मानेला गंभीर दुखापत, VIDEO व्हायरल
Rohit Sharma Big Reveals about t20 world cup final match
‘ऋषभ पंतच्या त्या चलाखीमुळं टी२० विश्वचषक जिंकलो’, तीन महिन्यांनंतर रोहित शर्माचा मोठा खुलासा
batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत

आता रोहित शर्मा आणि एमएस धोनीच्या कर्णधारपदाची तुलना होत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये एकमेव टी२० विश्वचषक जिंकला होता. या दोन संघांमधील मोठ्या फरकाबद्दल बोलताना, २००७ च्या अंतिम सामन्यात खेळलेल्या संघातील एकही खेळाडू ३० वर्षांपेक्षा कमी वयाचा नव्हता. त्यावेळी धोनी स्वतः २६ वर्षांचा होता.

हेही वाचा :   Asian Boxing Championships: लव्हलिना बोर्गोहाइनची अप्रतिम कामगिरी केली, आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

एम.एस.धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याच्या नावावर तीनही आयसीसी ट्रॉफी आहेत. टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याची प्रक्रिया २०१३ पासून सातत्याने सुरू आहे. २०२१ च्या टी२० विश्वचषकात टीम इंडियाला उपांत्य फेरीतही पोहोचता आले नाही. यावेळी उपांत्य फेरी गाठली, पण त्यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.