रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर अजून ही मोहम्मद नवाजने शेवटच्या षटकात टाकलेल्या वाई़ड चेंडूंची चर्चा होत आहे. आता या वाईड चेंडूवर रविचंद्रन अश्विनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अश्विन म्हणाला, ”जर तो चेंडू वाईड गेला नसता, तर त्याने थेट ड्रेसिंग रूममध्ये जाऊन निवृत्ती जाहीर केली असती.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरे तर भारतीय संघाला शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावांची गरज असताना, दिनेश कार्तिक यष्टीचीत झाला. त्यामुळे आता भारताला एका चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती आणि रविचंद्रन अश्विन क्रीजवर होता. अश्विनने बरीच हुशारी दाखवत, लेग-साइडच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूला छेडछाड केली नाही आणि तो चेंडू वाईड गेला. यानंतर त्याने शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

रविचंद्रन अश्विनने ज्या प्रकारे नवाजचा चेंडू सोडला आणि त्याला वाईड केले, त्यामुळे त्याचे खूप कौतुक केले जात आहे. कारण यामुळे सामना बरोबरीत आला आणि भारतीय संघावरील दडपण दूर झाले. हृषिकेश कानिटकर यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान अश्विनने त्या वाइड चेंडूवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”जर नवाजचा चेंडू वळला असता आणि माझ्या पॅडवर आदळला असता, तर मी थेट ड्रेसिंग रूममध्ये गेलो असतो आणि ट्विटरवर लिहिले असते, ‘धन्यवाद, माझी क्रिकेटची कारकीर्द अप्रतिम होती आणि तुम्हा सर्वांचे आभार.”

हेही वाचा – IND vs PAK : ‘त्याने अतिरिक्त डोकं लावलं’, शेवटच्या चेंडूआधी अश्विनसोबत काय चर्चा झाली होती? कोहलीने केला खुलासा, पाहा व्हिडिओ

रविचंद्रन अश्विनने याआधी त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेवटच्या चेंडूवर त्याच्या मनात काय चालले होते हे सांगितले होते. त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, ”चेंडू लेग साइडला जाताना पाहताच मी तो सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो वाइड झाला. वाइड्समधून धावा मिळताच मी एकदम रिलॅक्स झालो.”

हेही वाचा – SA vs BAN T20 World Cup 2022 : रिले रॉसोच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचे बांगलादेशला २०६ धावांचे लक्ष्य

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 r ashwin statement about mohammad nawazs wide ball in ind vs pak match vbm