भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ टी-२० चॅम्पियन ठरला आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या विजयानंतर देशातील जनतेचा आनंदालाही उधाण आलं आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून विश्वचषक विजयाचा आनंद साजरा केला आहे.

हेही वाचा – VIDEO : विश्वचषकातील विजयानंतर पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींकडून भारतीय संघाचं अभिनंदन; म्हणाले…

Rohit Sharma Announces Retirement from T20 Cricket in Marathi
Rohit Sharma T20 Retirement: रोहित शर्मानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती, वर्ल्डकप विजयानंतर ‘रो-को’ चा भारतीय चाहत्यांना धक्का
MS Dhoni praises Indian team for winning T20 World Cup 2024
IND vs SA : “फायनल पाहताना माझे हृदयाचे ठोके वाढले होते अन्…”, टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाचे केले कौतुक
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
hardik pandya
Ind vs SA T20 World Cup Final: हार्दिक पंड्या भावुक होत म्हणाला, ‘गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं…..पण माझा दिवस येईलच याची खात्री होती’…
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
India Beat South Africa by 7 Runs and Win T20 World Cup 2024 Trophy
T20 World Cup 2024: भारत ठरला विश्वविजेता, सूर्यकुमार यादवचा झेल आणि जसप्रीत बुमराहचे षटक ठरला टर्निंग पॉईंट
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
T20 World Cup 2024, IND vs SA Final
जिंकण्यासाठी ३० बॉल ३० रन होते, तरी दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये हरली, नेमकं त्या पाच ओव्हर्समध्ये घडलं काय?

नागपूरमध्ये नागरिक रस्त्यावर

विश्वचषकातील विजयानंतर नागपूरमध्ये मोठ्या संख्येने नागरिक हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले. यावेळी नागरिकांनी फटाके फोडत विजयाचा आनंद साजरा केला.

मुंबईतील विमानतळावर जल्लोष

विश्वचषक विजयाचा आनंद मुंबई विमानतळावरही बघायला मिळाला. यावेळी कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांनीही जल्लोष केला.

मरिन ड्राईव्हवरही क्रिकेट प्रेमींकडून जल्लोष

मुंबईतील मरिन ड्राईव्हवरही क्रिकेट प्रेमींना विजयांचा आनंद साजरा केला. विशेष म्हणजे मुंबईकर भरपावसात रस्त्यावर उतरले होते.

जम्मू-काश्मीरमध्येही विजयाचा जल्लोष

मुंबई बरोबरच जम्मू काश्मीरमध्येही भारतीय संघाच्या विजयानंतर जल्लोष बघायला मिळाला.

दिल्लीतही नागरिक रस्त्यावर

दिल्लीतही नागरिकांनीही रस्त्यावर उतरत भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी भारत माता की जय, वंदे मारतरम अशा घोषणाही देण्यात आल्या.

केरळमध्ये क्रिकेटप्रेमींकडून जल्लोष

केरळमध्येही भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला.

दरम्यान, शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने दमदार गोलंदाजी केली. तत्पूर्वी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे.