टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अत्यंत खराब प्रदर्शन करून भारत या स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तसेच संघाचे प्रदर्शन आणि रोहित शर्माची कप्तानी यावरूनही अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. यादरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारतीय संघाची कठोर शब्दात निंदा केली आहे. त्याने म्हटलंय की भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्याच्या लायकच नव्हता.

शोएबने काल १० नोव्हेंबरला ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने भारतीय संघाची निंदा केली आहे. तो म्हणाला की हा अतिशय लज्जास्पद पराभव आहे. भारतीय संघने खूपच निराशाजनक प्रदर्शन केले. यानंतर ते हरण्याच्या आणि स्पर्धेतून बाहेर पाडण्याच्याच लायक होते. इंग्लंडने भारताला अतिशय वाईट पद्धतीने हरवले. भारताची गोलंदाजी अत्यंत वाईट होती. वेगवान गोलंदासाठी हा पीच उपयुक्त होता मात्र भारताकडे असा एकही वेगवान गोलंदाज नव्हता. भारताने चहलला का खेळवले नाही असा प्रश्नही त्याने यावेळी विचारला आहे. भारताची संघनिवड गोंधळलेली होती असेही तो म्हणाला.

How India Were All Out For 46 Rohit Sharma Decision of Batting First After Winning Toss Promoting Virat Kohli at No 3 IND vs NZ
IND vs NZ: भारताच्या वाताहतीला ‘हे दोन’ निर्णय कारणीभूत, रोहित शर्माच्या निर्णयाचा बसला मोठा फटका, तर विराट…
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
PV Sindhu enters the second round of the Denmark Open Badminton Tournament sports news
सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
Babar Azam Tweet For Virat Kohli Goes Viral After Pakistan Cricketer Struggling with Bad Form Fans Urge Kohli to Support him
Babar Azam: “हे दिवसही निघून जातील…”, बाबरने विराटसाठी केलेलं ट्वीट होतंय व्हायरल, विराटकडे बाबर आझमला पाठिंबा देण्याची चाहत्यांची मागणी
IND vs AUS Team India Coach Amol Muzumdar
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कोचच्या पाकिस्तानला शुभेच्छा, कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या विजयासाठी चाहत्यांकडून प्रार्थना
IND W vs AUS W Radha Yadav Replaces Injured Asha Shobhana in India Playing XI After Toss
IND W vs AUS W: भारताची प्लेईंग सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच पुन्हा बदलली, आशा शोभना अचानक का झाली संघाबाहेर?
IND W vs PAK W match Harmanpreet Kaur Injury Video viral
Harmanpreet Kaur : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या मानेला गंभीर दुखापत, VIDEO व्हायरल
Shivam Dube smart reply on Which Captain you like Rohit Sharma or MS Dhoni
Shivam Dube : रोहित की धोनी, कोण आहे आवडता कर्णधार? शिवम दुबेने चतुराईने दिलेल्या उत्तराचा VIDEO व्हायरल

घटस्फोटाच्या चर्चांवर सानिया मिर्झाचं शिक्कामोर्तब? म्हणाली, “तुटलेलं हृदय…”

अख्तरच्या म्हणण्यानुसार, बटलर आणि हेल्स यांच्या आक्रमक फलंदाजीनंतर भारताने सामना जिंकण्याच्या आशाच सोडून दिल्या होत्या. तो म्हणाला की भारतासाठी खरंच हा एक वाईट दिवस होता. नाणेफेक हरल्यानंतरच भारताचे मनोबल डगमगले होते. इंग्लंडच्या फलंदाजीच्या पहिल्या पाच षटकांमध्येच भारताने हात वर केले. निदान त्यांनी प्रयत्न तरी करायला हवे होते. मात्र या सामन्यात भारताने कोणत्याही प्रकारची आक्रमकता दाखवली नाही.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरला. भारतीय संघाचे फलंदाज चांगले प्रदर्शन करत नव्हते. तथापि, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत अर्धशतक झळकावले. या दोघांमुळेच भारतीय संघ १६८ धावांपर्यंत मजल मारू शकला. मात्र इंग्लने कोणताही गडी बाद न होता हे लक्ष्य अगदी सहज साध्य केले.