आयसीसी स्पर्धेत भारत पुन्हा एकदा नॉकआउट सामन्यातून बाहे पडला आहे. यावेळी भारताला इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अॅडलेडमध्ये भारताचा १० गडी राखून पराभव झाला. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक केले. त्याने कठीण परिस्थितीत ४० चेंडूत ५० धावा केल्या. कोहली सध्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, पण त्याचे यश संघाला अंतिम फेरीत नेऊ शकले नाही.

चाहत्यांनाही कोहलीबद्दल वाईट वाटत आहे कारण विराटने गेल्या आठ वर्षांत झालेल्या चार टी-२० विश्वचषकांपैकी तीनमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने संघाचे ओझे आपल्या खांद्यावर उचलले, पण त्याला ट्रॉफी उचलता आली नाही. यावेळी विराटने सहा सामन्यांच्या सहा डावात २९६ धावा केल्या. त्याची सरासरी ९८.६७ होती आणि त्याचा स्ट्राइक रेट १३६.४१ चा होता. या दरम्यान विराटने तीन अर्धशतके झळकावली.

Loksatta explained Where exactly did the Indian women team go wrong How affected by the failure of Smriti Mandhana
जेतेपदाचे ध्येय, पण साखळीतच गारद! भारतीय महिला संघाचे नेमके चुकले कुठे? स्मृती मनधानाच्या अपयशाचा कितपत फटका?
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Cameron Green ruled out of Test series against India in Border-Gavaskar Trophy 2024-25
IND vs AUS : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडू झाला बाहेर
IND vs AUS Team India Coach Amol Muzumdar
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कोचच्या पाकिस्तानला शुभेच्छा, कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या विजयासाठी चाहत्यांकडून प्रार्थना
India vs Australia Womens T20 World Cup 2024 Semifinal Scenario for Team india Need Big win by 60 Runs
IND W vs AUS W: भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्ध किती धावांनी विजय आवश्यक? कसं आहे समीकरण
NZ W vs AUS W Match Highlights Australia beat New Zealand
NZ W vs AUS W : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय, भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग झाला खडतर
Womens T20 World Cup 2024 Pak W vs Sri W match highlights in Marathi
Womens T20 WC 2024 : श्रीलंका-पाक सामन्यात रुमाल पडल्याने फलंदाजाला मिळाले जीवदान, नेमकं कारण काय? जाणून घ्या
batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत

टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी कोहलीच्या नशिबी नाहीच –

कोहलीने २०१४ आणि २०१६ मध्येही जबरदस्त कामगिरी केली होती. विराटने २०१४ मध्ये ३१९ धावा केल्या होत्या, जेव्हा टीम इंडिया फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध हरली होती. त्यानंतर २०१६ मध्ये घरच्या मैदानावर झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये विराटने २७३ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२१ मध्ये टीम इंडिया बाद फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही. यावेळी संघाने उपांत्य फेरी गाठली आणि आता बाहेर पडले. यावरुन विराट कोहलीच्या नशिबात टी-२० विश्वचषक ट्रॉफी नाही असे दिसते. त्याच्या उपस्थित भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

२०१४ पासून भारताने ७ नॉकआउट सामने गमावले –

भारतीय संघाने शेवटचे २०१३ मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पराभूत केले होते. त्यानंतर आयसीसी टूर्नामेंटमध्ये ७ नॉकआउट सामने खेळले, पण विजय मिळवता आला नाही.

हेही वाचा – World Cup: दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच भारतही ऐनवेळी कच खाणारा संघ; २०१४ पासूनची ‘ही’ कामगिरीच आहे पुरावा

आयसीसी टी-२० विश्वचषक २०१४ अंतिम फेरी – श्रीलंकेविरुद्ध पराभूत
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०१५ उपांत्य फेरी – ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६ उपांत्य फेरी- वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ अंतिम फेरी – पाकिस्तानविरुद्ध पराभूत
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०१९ उपांत्य फेरी – न्यूझीलंडकडून पराभूत
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप २०२१ अंतिम फेरी – न्यूझीलंडविरुद्ध पराभूत
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ उपांत्य फेरी- इंग्लंडविरुद्ध पराभूत