दुबई : बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिलांची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.ही स्पर्धा ३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत रंगणार असून सामने दुबई आणि शारजा येथे खेळवले जातील. ‘‘महिलांची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशऐवजी अन्यत्र खेळवावी लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, आता अमिराती येथे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल याची मला खात्री आहे,’’ असे ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अॅलर्डाइस म्हणाले.

हेही वाचा >>> कर्णधारपदामागे धावू नकोस! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीचा बुमराला सल्ला

former pakistan cricketer basit ali advises jasprit bumrah to focus on bowling instead of captaincy
कर्णधारपदामागे धावू नकोस! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीचा बुमराला सल्ला
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Darius Visser Breaks Yuvraj Singhs Record of Most Runs in Single Over with 39 runs
39 Runs In An Over: एका षटकात ३९ धावा… ‘या’ फलंदाजाने मोडला युवराज सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड, एका ओव्हरमध्ये ६ षटकार
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
Women's T20 World Cup 2024 Shifted to UAE ICC Announced
Women’s T20 World Cup: बांगलादेशातील अराजकतेचा क्रिकेट बोर्डाला फटका, आता ‘या’ देशात होणार महिला टी-२० वर्ल्डकप; ICCने केली घोषणा
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”
Manu Bhaker says Neeraj is my senior player
Manu Bhaker Neeraj Chopra : ‘माझ्यात आणि नीरजमध्ये…’, मनू भाकेरने लग्नाबाबतच्या चर्चेवर सोडले मौन; म्हणाली, तो मला…
Robin Uthappa Statement on Battle With Depression Video
Robin Uthappa: “माझी जी अवस्था झाली होती त्याची लाज वाटत असे”, रॉबिन उथप्पाने उलगडला तो अवघड काळ

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील नागरिकांच्या तीव्र उद्रेकामुळे बांगलादेशातील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे तेथील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीनेही याबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळे ‘आयसीसी’ला स्पर्धा अन्यत्र हलविणे भाग पडले. या विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत ‘आयसीसी’ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विचारणा केली होती. मात्र, त्यांचा प्रस्ताव ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांनी या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवली होती. परंतु ‘आयसीसी’ने आयोजनाचा मान संयुक्त अरब अमिरातीला दिला आहे. त्याच वेळी भविष्यात बांगलादेशात जागतिक दर्जाची स्पर्धा आयोजित करण्याची आपल्याला आशा असल्याचेही ‘आयसीसी’ने म्हटले आहे.