Shubman Gill reaction after defeat : टी-२० विश्वचषक जिंकून टीम इंडियाने करोडो चाहत्यांची मनं जिंकली. आतापर्यंत चाहते खूप आनंदी दिसत होते, मात्र युवा संघाची झिम्बाब्वेविरुद्धची लाजिरवाणी कामगिरी पाहून चाहते नाराज झाले आहेत.झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला १३ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ११६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव अवघ्या १०२ धावांवर गारद झाला. या पराभवानंतर संघाचा कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला? जाणून घेऊया.

शुबमन गिलची पराभवावर प्रतिक्रिया –

सामन्यानंतर शुबमन गिल म्हणाला, “आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली, पण आम्ही क्षेत्ररक्षणात कमी पडले. आम्ही संघाला शोभेल अशी फलंदाजी केली नाही आणि प्रत्येकजण थोडा थकलेला दिसत होता. तसेच प्रत्येकाला खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर फलंदाजीचा आनंदा घ्यायचा होता, परंतु तसे होऊ शकले नाही. आम्ही अर्ध्या वाटेत ५ विकेट्स गमावल्या. मी शेवटपर्यंत टिकून राहिलो असतो तर आमच्यासाठी चांगले ठरले असते. मी ज्या प्रकारे आऊट झालो त्यामुळे मी खूप निराश आहे. उर्वरित सामना आमच्या हातून निसटला. आमच्यासाठी थोडी आशा होती पण जेव्हा तुम्ही ११५ धावांचा पाठलाग करत असता आणि तुमचा १०व्या क्रमाकाचा फलंदाज सामना जिंकवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा तुम्हाला कळते की काहीतरी गडबड आहे.”

Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Dinesh Karthik reaction about Rishabh Pant and MS Dhoni
IND vs BAN : ऋषभ पंत कसोटीत धोनीपेक्षा सरस आहे का? दिनेश कार्तिकने दिले उत्तर, चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन
IND vs BAN R Ashwin wife Prithi interview video
IND vs BAN : ‘मुलींना काय गिफ्ट देणार…’, पत्नीच्या ‘फिरकी’वर रविचंद्रन अश्विन ‘क्लीन बोल्ड’, BCCI ने शेअर केला मुलाखतीचा VIDEO
IND vs BAN Jisko Jitna Run Banana Hai Bana Lo Sirf 1 Ghanta hai Rishabh Pant reveals Rohit Sharma message
IND vs BAN : ‘रोहित भाईने अगोदरच सांगून ठेवले होते की तुम्हाला…’, ऋषभ पंतने कर्णधाराच्या ‘त्या’ मेसेजबद्दल केला खुलासा
IND vs BAN Ravichandran Ashwin Broke Anil Kumble Record
IND vs BAN : अश्विन अण्णाची फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल, अनिल कुंबळेचा विक्रम मोडत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
IND vs BAN Shubman Gill fifth Test century against Bangladesh
IND vs BAN : शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद, भारताने बांगलादेशला दिले ५१५ धावांचे लक्ष्य
Travis Head Broke Rohit Sharma Record in ENG vs AUS ODI
ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा

टीम इंडियाची फलंदाजी ठरली अपयशी –

११६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने पॉवर प्लेमध्येच ४ विकेट्स गमावल्या. यानंतरही एकामागून एक विकेट पडतच राहिल्या. ज्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला शुबमन गिलने २९ चेंडूंत ५ चौकारांसह ३१ धावा केल्या. अभिषेक शर्मा, रिंकू सिंग आणि मुकेश कुमार खाते न उघडताच बाद झाले. ऋतुराज गायकवाडने ७, रियान परागने २, ध्रुव जुरेलने ६, वॉशिंग्टन सुंदरने २७, रवी बिश्नोईने ९ आणि आवेश खानने १६ धावा केल्या. अशा भारतीय संघाची फलंदाजी पहिल्याच सामन्यात अपयशी ठरली.

हेही वाचा – झिम्बाब्वेची विजयी सलामी! विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ पहिल्याच सामन्यात ठरली अपयशी

भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव –

झिम्बाब्वेने भारताविरुद्ध मोठी कामगिरी नोंदवली आहे. झिम्बाब्वेने जागतिक विजेत्या संघाविरुद्ध सर्वात कमी लक्ष्याचा यशस्वी बचाव केला आहे. ११६ धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव करणे ही भारताविरुद्धच्या टी-२० मधील कोणत्याही संघाची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता, ज्याने २०१६ मध्ये भारताला दिलेल्या १२७ धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव केला होता.

हेही वाचा – IND vs ZIM 1st T20 : भारतीय संघात तीन युवा खेळाडूंनी केले पदार्पण, शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली मिळाली संधी

भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करणारे संघ –

११६ झिम्बाब्वे, २०२४
१२७ – न्यूझीलंड, २०१६
१३१ दक्षिण आफ्रिका, २००९
१४६ झिम्बाब्वे, २०१६
१५० वेस्ट इंडिज, २०२३