बीसीसीआयच्या शुक्रवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान एन. श्रीनिवासन यांनी भूषविल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ, असा इशारा बिहार क्रिकेट असोसिएशनने दिला आहे. याच असोसिएशनच्या जनहित याचिकेवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयची चौकशी समिती बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवली होती.
‘‘बीसीसीआयने नेमलेली द्विसदस्यीय चौकशी समिती बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांनी अध्यक्षस्थान भूषविण्याचा अधिकार नाही. जर ते अध्यक्षस्थानी विराजमान झाले तर आम्ही न्यायालयात याचिका दाखल करू. हा न्यायालयाच्या निर्णयाचा स्पष्टपणे अवमान ठरेल,’’ असे बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा