भारतीय संघ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आव्हान कायम ठेवणार की स्पर्धेतील आव्हान आज संपुष्टात येणार याचा निकाल आज लागणार आहे. सलग दोन पराभव पत्करल्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ असंख्य आव्हानांना सामोरे जात आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरी गाठायची असल्यास भारताला सर्वप्रथम बुधवारी अफगाणिस्तानला पराभूत करावं लागणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धचा हा सामना एकतर्फी होणार नाही हे अफगाणिस्तानची आणि भारताची आतापर्यंतची कामगिरी पाहिल्यावर निश्चित होत आहे. त्यामुळेच या सामन्याबद्दल फार उत्सुकता आहे. हा सामना नक्की कधी कुठे पाहता येणार, संघात काय बदल असू शकतात, आतापर्यंत या स्पर्धेत दोन्ही संघांनी काय कामगिरी केलीय हे जाणून घेऊयात…
भारताची स्थिती काय?
अबू धाबी येथे अव्वल-१२ फेरीतील लढतीत उभय संघ आमनेसामने येणार असून या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. भारताच्या संघनिवडीकडेही सर्वांचे लक्ष राहणार असून अफगाणिस्तानने यापूर्वी आपल्याला अनेकदा कडवी झुंज दिली असल्याने चाहत्यांना रंगतदार सामना पाहायला मिळेल.दुसऱ्या गटात समावेश असलेल्या भारताला सलामीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने सहज धूळ चारली. त्यामुळे भारत सध्या गुणतालिकेत शून्य गुणासह पाचव्या स्थानी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा