Ind vs Aus Series 2013: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या कारकिर्दीत अनेक प्रसंगी भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. इशांत शर्माने शानदार गोलंदाजी करून कसोटी क्रिकेटचा दर्जा उंचावला आहे. १०० कसोटी सामने खेळलेल्या काही वेगवान गोलंदाजांपैकी इशांत शर्मा एक आहे. मात्र, कसोटीप्रमाणेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इशांतला करिअर करता आले नाही.

दरम्यान, इशांत शर्माने अलीकडेच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील वाईट टप्प्याची आठवण करून देत काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की, त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा तो जवळपास एक महिना ढसाढसा रडायचा.

Abhishek Sharma Highest T20I Score for India 135 Runs Breaks Many Records IND vs ENG 5th T20I
IND vs ENG: अभिषेक शर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये कोणत्याच भारतीय फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Harshit Rana makes T20I debut as concussion substitute against England
IND vs ENG: हर्षित राणाचं चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान अनोखं पदार्पण, पहिल्याच षटकात घेतली विकेट; नेमकं काय घडलं?
Usman Khawaja becomes first Australian to score a Test double century in Sri Lanka at Galle
Usman Khawaja Double Century : उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक! श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’
Shreyas Iyer argues with umpires over controversial dismissal Ajinkya Rahane does interferen in Ranji Trophy 2025
Shreyas Iyer Controversy : आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंपायरमध्ये जुंपली, अजिंक्य रहाणेला करावा लागला हस्तक्षेप
IND vs ENG Suryakumar Yadav shed light on the situation, revealing that the exclusion of Mohammed Shami was purely a tactical decision
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा

संघाच्या पराभवाचे कारण मी होतो –

इशांत शर्मा अलीकडेच क्रिकबझच्या राइज ऑफ न्यू इंडिया शोमध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्याची आठवण करून दिली. २०१३ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामना खेळला जात होता. त्यावेळी धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची स्थिती वाईट होती. शेवटच्या ३ षटकात संघाला ४४ धावांची गरज होती. त्यावेळी इशांत शर्माने एका षटकात ३० धावा दिल्या होत्या.

हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: केएल राहुलच्या संघातील स्थानाबद्दल रवी शास्त्रीचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘जर उपकर्णधार…’

या सामन्याबद्दल बोलताना इशांत शर्मा म्हणाला, “२०१३ मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला सामना माझ्यासाठी सर्वात वाईट क्षण होता. माझ्यावर यापेक्षा वाईट वेळ कधी येऊ शकते, असे मला वाटत नाही. माझ्यासाठी ते अवघड होते. आणि मी खूप धावा दिल्या म्हणून नाही, तर मी सर्वात जास्त दुखावलो होतो, ते म्हणजे संघाच्या पराभवाचे कारण मी होतो. त्यावेळी मी माझ्या पत्नीला डेट करत होतो. जवळपास महिनाभर त्तिच्याशी फोनवर बोलत असताना मी रोज रडत होतो.”

माही भाई आणि शिखरने साथ दिली होती –

त्यानंतर बराच काळ इशांत शर्माने त्या पराभवासाठी स्वत:ला जबाबदार मानले. इशांत शर्माने खुलासा केला की, त्यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन त्याच्याशी बोलायला आले होते. त्यानी इशांतला प्रोत्साहन दिले होते.

हेही वाचा – PSL 2023: पाकिस्तान सुपर लीग दरम्यान चोरी! चोरट्यांनी स्टेडियममधील सुरक्षा कॅमेरे, केबल्स आणि बॅटऱ्याही केल्या लंपास

क्रिकबझवर इशांत पुढे म्हणाला, “सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माही भाई आणि शिखर धवन माझ्या खोलीत आले. ते म्हणाले, बघ तू चांगला खेळत आहेस. पण त्या एका सामन्यानंतर बहुधा सगळ्यांना वाटू लागलं की मी मर्यादीत षटकातील गोलंदाज नाही.”

Story img Loader