ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपवून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दिल्ली कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत आटोपल्यानंतर टीम इंडियाने ४ गडी गमावून ११५ धावांचे लक्ष्य गाठले. विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने जडेजा आणि अश्विन जोडीच्या गोलंदाजीचे कौतुक केले. त्याचवेळी त्याने विराट कोहलीच्या फलंदाजीवरही भाष्य केले.

खेळपट्टीबाबत रोहित शर्माची प्रतिक्रिया –

रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितले की, ”हा आमच्यासाठी खूप मोठा निकाल आहे. कालचा दिवस ज्या प्रकारे संपला त्यानंतर अशी कामगिरी कौतुकास्पद आहे. पहिल्या डावाच्या धावसंख्येपासून आम्ही १ धावांनी मागे असलो तरी या खेळपट्टीवर आम्हाला शेवटी फलंदाजी करावी लागली. माझ्या मते गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. केवळ एका सत्रात ९ विकेट्स मिळवणे विलक्षण आहे. आणि त्यानंतर आम्ही फलंदाजी करताना सामना चांगल्या प्रकारे संपवला.”

Rohit Sharma Argues With Umpire as They Stop Match Due to Bad Light in IND vs NZ Test Watch Video
IND vs NZ: बंगळुरू कसोटीत झाला वाद, रोहित शर्मा पंचांवर भडकला, किवी फलंदाजही गेले मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
IND vs NZ New Zealand break 12-year record with 356 Runs lead Bengaluru Test
IND vs NZ: न्यूझीलंड संघ भारतावर पडला भारी, १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाने भारताविरुद्ध घेतली एवढी मोठी आघाडी
IND vs NZ 1st Test Match Updates in Marathi
IND vs NZ : भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन मोठे बदल, शुबमनच्या जागी द्विशतकवीरला दिली संधी
New Zealand Captain Tom Latham Statement on Team India Ahead of IND vs NZ Test Series
IND vs NZ: “…तर आम्ही भारतावर विजय मिळवू”, भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने बनवली जबरदस्त रणनिती, हिटमॅन चक्रव्यूह भेदणार?
Rohit Sharma Likely To Miss IND vs AUS One Test in Australia Border Gavaskar Trophy
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काही कसोटींना मुकणार? काय आहे कारण
England Broke India 20 Year Old Record in Pakistan in PAK vs ENG Multan Test Harry Brook Triple Century Joe Root Double Century
PAK vs ENG Test: इंग्लंडने भारताचा पाकिस्तानमधील २० वर्षे जुना विक्रम मोडला, कसोटी सामन्यात उभी केली विक्रमांची चळत
India vs Bangladesh 1st T20 Match highlights
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा

रोहित पुढे म्हणाला की, “अशा खेळपट्टीवर फलंदाजी करण्यासाठी तुम्हाला वेगळा विचार करावा लागतो. आम्ही त्यासाठी तयार होतो आणि त्यानुसार आमचे शॉट्स खेळले. आम्हाला अजिबात अडचणीत पडायचे नव्हते आणि आम्ही सतत योग्य ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही फक्त फलंदाजाची चूक होण्याची वाट पाहत होतो आणि ते घडले. जेव्हा जेव्हा आपण अशा वातावरणात खेळतो, तेव्हा गोलंदाजांसाठी खेळपट्टीवर काहीतरी नक्कीच असते. आमच्या लक्षात आले की पहिल्या सत्रात फलंदाजी थोडी अवघड असते, पण उरलेल्या २ सत्रात ती खूप संथ विकेट बनते.”

रोहित शर्माने या खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय –

त्याचवेळी, रोहितने कोहली आणि जडेजा यांच्यातील भागीदारीवर देखील भाष्य केले. त्याने सांगितले की, ”मला वाटते की आमच्या पहिल्या डावात जडेजा आणि विराट यांच्यातील भागीदारीमुळे आम्हाला या सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अक्षर आणि अश्विनने ज्या प्रकारे शानदार फलंदाजी केली. त्याने आम्हाला पूर्णपणे फलंदाजीत परत आणले. मला वाटते की या मालिकेतील आमच्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात सकारात्मक बाजू आहे. जडेजा आणि अश्विन अशा परिस्थितीत गोलंदाजी करण्यात पारंगत आहेत. त्यांचा सामना करणे अजिबात सोपे काम नाही.”

भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दिशेने पाऊल टाकले –

ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये, आपले स्थान निश्चित करण्यासाठी किमान ३ सामने जिंकणे आवश्यक होते. मालिकेतील पहिले २ कसोटी सामने जिंकल्यानंतर आता टीम इंडियाने फायनलसाठीही आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. दुसरीकडे, जर कांगारू संघ या कसोटी मालिकेतील उर्वरित २ पैकी १ सामना जिंकू शकला नाही, तर त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करणे कठीण होऊ शकते. त्यासाठी त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंका कसोटीच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.