सोमवारी (दि.१३ मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२३ कसोटी मालिकेचा अंतिम सामना पार पडला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना अनिर्णित झाला. यासह भारतीय संघाने मालिका २-१ने खिशात घातली. विशेष म्हणजे, मागील चारही बॉर्जर-गावसकर ट्रॉफी मालिकेचे निकाल हे भारताच्याच बाजूने लागले आहेत. त्यात आणखी एक मजेशीर गोष्ट घडली ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पुजाराच्या गोलंदाजीचा फोटो ट्वीट करत चेष्टा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचे स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र सामन्यानंतर अश्विनने एक मजेशीर ट्विट केले आहे.

“मी काय करू, नोकरी सोडू” – आर अश्विन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सावध फलंदाजी केली, त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. विशेष बाब म्हणजे यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नियमित गोलंदाजांऐवजी अर्धवेळ गोलंदाजांकडून गोलंदाजी केली. रोहितने चेतेश्वर पुजाराचे एक षटकही टाकले. पुजाराची गोलंदाजी पाहून सर्वांनाच आनंद झाला. त्याचवेळी अश्विनने पुजाराच्या गोलंदाजीवर एक मजेशीर ट्विट केले आहे.

अहमदाबाद कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाज आर अश्विनने चेतेश्वर पुजाराच्या गोलंदाजीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनने पुजाराचा फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये पुजारा हातात चेंडू घेऊन दिसत आहे. त्याचा आनंद घेत अश्विनने लिहिले, ‘काय करू, नोकरी सोडा.’ स्पिन मास्टरच्या या ट्विटने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे. अश्विनने ट्विटसोबत हसणारा इमोजीही टाकला आहे. त्यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण चेतेश्वर पुजारा पहिल्यांदाच गोलंदाजी करताना दिसला होता.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: नाटू-नाटूची सर्वांनाच पडली भुरळ! सुनील गावसकर, रवी शास्त्रींसहित सर्वच कॉमेंट्रेटर्सने धरला ठेका, पाहा Video

या सामन्यात अश्विनने ७ विकेट्स घेतल्या

अहमदाबाद कसोटीतही अश्विनची आगपाखड पाहायला मिळाली. सामन्याच्या दोन्ही डावात त्याने ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने पहिल्या डावात ६ फलंदाज बाद केले, तर दुसऱ्या डावात एक बळी घेतला. या संपूर्ण मालिकेत अश्विनची धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अश्विन सध्या कसोटी क्रिकेटमधील नंबर वन गोलंदाज आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठीही शेवटची कसोटी फायदेशीर ठरली. कोहलीने या सामन्यात १८६ धावांची शानदार खेळी केली. दुर्दैवाने त्याचे द्विशतक अवघ्या १४ धावांनी हुकले. त्याचबरोबर शुबमन गिलनेही शानदार शतक झळकावत आपली दावेदारी मांडली आहे. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत उभय संघांमधील स्पर्धा पहायला मिळणार आहे. फायनल सामना जूनमध्ये होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus ashwin said after the match was drawn what should i do leave the job on cheteshwar pujaras bowling avw
Show comments