India vs Australia T20 Series, Predication playing 11: २३ नोव्हेंबरपासून, विश्वचषक संपल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आमनेसामने येणार आहेत. या मालिकेकडे टीम इंडियाच्या २०२४ टी-२० विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला या मालिकेसह तीन टी-२० मालिका खेळायच्या आहेत. या टी-२० मालिकेसाठी रोहित-कोहलीसह विश्वचषक खेळलेल्या बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या टी-२० मालिकेसाठी संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघासारखाच आहे. विश्वचषकात न खेळलेले केवळ सूर्यकुमार आणि अक्षर पटेल यांचेच संघात पुनरागमन झाले आहेत. या टी-२० मालिकेत सर्वांच्या नजरा ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि यशस्वी जैस्वाल यांच्यावर असतील. त्यांना २०२४च्या टी-२० विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताचा संभाव्य अंतिम अकरा संघ कसा असू शकतो, यावर एक नजर टाकूया.

हेही वाचा: IPL 2024: गौतम गंभीरचे कोलकता नाईट रायडर्समध्ये पुनरागमन, आयपीएल २०२४मध्ये बजावणार ‘ही’ भूमिका

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० साठी भारताची संभाव्य प्लेईंग-११

यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताच्या प्लेइंग-११च्या सलामीची जबाबदारी पार पाडू शकतात. दुसरीकडे, यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. यानंतर मोठे फटके मारण्यात माहीर असलेला तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर खेळायला येऊ शकतो. गरज भासल्यास तिलक वर्मा ऑफ स्पिन गोलंदाजीही करू शकतो, म्हणजेच तो अष्टपैलू खेळाडूची भूमिकाही बजावू शकतो.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत रिंकू सिंगला फिनिशरच्या भूमिकेत स्थान मिळवण्याची ही सुवर्ण संधी असेल. रिंकूला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. गेल्या आयपीएल हंगामात आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्वांना प्रभावित केल्यानंतर, रिंकूने आयर्लंड दौऱ्यावर टी-२० मालिकेतही छाप सोडली होती.

अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारणार हे जवळपास निश्चित झाले आहे. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी वॉशिंग्टन सुंदरच्या खांद्यावर असेल. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखाली प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार यांच्याकडे दिली जाऊ शकते.

हेही वाचा: Team India: टी-२० विश्वचषकात रोहित-विराट पुनरागमन करणार? आयपीएलमधील कामगिरीनंतर घेणार निर्णय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 साठी भारताची संभाव्य एकादश:

भारत: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, श्रेयस अय्यर (टी-२० मध्ये चौथा, पाचवा)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus how will indias playing xi fare in the first t20 against australia find out avw
Show comments