Suryakumar Yadav on Shreyas Iyer: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करत वन डे कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने ५० षटकांत १० गडी गमावून २७६ धावा केल्या.

जर सूर्यकुमार यादवच्या खेळीबद्दल सांगायचे झाले तर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४९ चेंडूंचा सामना करत ५० धावांची खेळी खेळली होती. ज्यामध्ये एक षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. अनेक दिवसांपासून एकदिवसीय क्रिकेटमधील खराब कामगिरीच्या काळातून जात असलेल्या सूर्याने आपण वन डे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाज असल्याचे सिद्ध केले आहे. त्याच्या खेळीने दुखापतीतून सावरत असलेल्या श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात आले आहे. सध्या त्याच्या वाईट फॉर्ममधून जात आहे.

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
Usman Khawaja becomes first Australian to score a Test double century in Sri Lanka at Galle
Usman Khawaja Double Century : उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक! श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाची मानली जात आहे. विश्वचषकापूर्वी पहिल्या दोन सामन्यांमध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवने या संधीचा फायदा घेत पहिल्या सामन्यात दमदार खेळी करत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याला बाहेर बसण्याचे कारण म्हणजे फलंदाज फ्लॉप झाला.

ऑस्ट्रेलिया मालिकेमुळे भारतीय संघातील काही खेळाडूंना विश्वचषकापूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये इशान किशनने संधीचा फायदा घेत प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के केले. असाच काहीसा प्रकार आता सूर्यकुमार यादवच्या बाबतीत झाला. एकदिवसीय संघातील खराब कामगिरीमुळे टीकेचा सामना करणाऱ्या या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे बरेच काही बदलू शकते.

हेही वाचा: IND vs AUS: “आप एसी में थे, मैं गर्मी में था”, पाच विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद शमी असं का म्हणाला? जाणून घ्या

सूर्यकुमारचे नशीब बदलेल का?

गेल्या काही सामन्यांमध्ये कसोटी असो वा वन डे, सूर्यकुमार यादवला एका खेळाडूमुळे बाहेर बसावे लागले, तो म्हणजे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने सूर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. एकदिवसीय मालिकेत अय्यरच्या अनुपस्थित सूर्यकुमार यादव खेळायला आला. आता दोघांचाही समावेश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्लेईंग-११ मध्ये करण्यात आला होता. त्या सामन्यात जिथे श्रेयस फ्लॉप ठरला आणि सूर्याने अर्धशतक केले. यामुळे श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात आले आहे. जर आगामी दोन वन डे सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही तर त्याला विश्वचषक संघातून देखील वगळले जाऊ शकते.

हेही वाचा: IND vs AUS: अक्षर पटेलची दुखापत किती गंभीर? टीम इंडिया अष्टपैलूच्या शोधात, सामन्यानंतर अश्विनचा स्पेशल Video व्हायरल

भारताने सामना जिंकला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली. यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत १० गडी गमावून २७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने हा सामना पाच विकेट्स राखून जिंकला. आता या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Story img Loader