Ravindra Jadeja no ball in Indore Test: पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे इंदोरच्या होळकर स्टेडियवर देखील परिस्थिती फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल पाहायला मिळाली. परिणामी बुधवारी (१ मार्च) सुरू झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ स्वस्तात गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियन संघा देखील दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. पण पाहुण्या संघाने भारतावर ८८ धावांची आघाडी घेतली. मात्र रवींद्र जडेजाच्या नो बॉल वरून भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी चांगलेच त्याला फैलावर घेतले आहे.

भारतीय गोलंदाजांना पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करण्याच्या अनेक संधी होत्या, पण नशीब टीम इंडियासोबत नव्हते. जडेजाने पहिल्या दिवशी अनेक नो बॉल टाकले. एकदा त्याने लाबुशेनला नो बॉलवर बोल्ड केले. जडेजा हा टीम इंडियासाठी महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने दुखापतीतून उल्लेखनीय पुनरागमन करून कर्णधाराचा विश्वास संपादन केला आहे.

IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

गेल्या वर्षी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर जडेजाला पाच महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले आणि या वर्षी जानेवारीत त्याला क्रिकेटमध्ये परतण्याची संधी मिळाली. परतल्यावर जडेजाने सौराष्ट्रसाठी रणजी ट्रॉफी सामन्यात आठ विकेट घेतल्या. यानंतर त्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

हेही वाचा: IND vs AUS: शंभर नंबरी वैदर्भीय सोनं! मिचेल स्टार्कच्या दांड्या गुल करत उमेश यादवने साजरा केला अनोखा विक्रम

जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले असताना, या मालिकेत खेळाडूला एका मोठ्या आणि नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे. डावखुरा ऑर्थोडॉक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यापासून अनेक फ्रंटफूट नो-बॉल टाकत आहे. बुधवारी जडेजाने पुन्हा एकदा नो बॉल टाकला. त्याच्या पहिल्या नो बॉलवर भारताला जास्त त्रास झाला नाही, पण दुसऱ्या नो बॉलवर मार्नस लबुशेन क्लीन बोल्ड झाला. मात्र, रिप्लेमध्ये जडेजाने ओव्हरस्टेप केल्याचे दिसून आले.

भारताचे माजी फलंदाज आणि कर्णधार सुनील गावसकर यांनी जडेजाने खूप नो-बॉल टाकल्याबद्दल टीका केली आहे. ते म्हणाले, “हे अस्वीकार्य आहे. त्याला काही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाले आहेत पण फिरकीपटूने असे नो-बॉल टाकणे भारताला महागात पडू शकते. त्याच्यासोबत पारस म्हांबरे (गोलंदाजी प्रशिक्षक)यांनी बसावे आणि सांगावे.” तिसर्‍या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत समालोचन करताना गावसकर म्हणाले होते, “जडेजाने लाइन मागून गोलंदाजी करावी. मार्नसने त्या धावा भारताला किती महागात पडू शकतात हे दुसऱ्या डावात कळणार आहे, तो शून्यावर बाद होऊ शकला असता.”

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: उमेश-अश्विनचा कहर! ११ धावांत ६ विकेट्स अन् कांगारूंचा खेळ खल्लास, ऑस्ट्रेलियाकडे केवळ ८८ धावांची आघाडी

तत्पूर्वी बुधवारी उभय संघांतील हा तिसरा कसोटी सामना सुरू झाली. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला दारून पराभव स्वीकारावा लागला होता. असात तिसऱ्या कसोटीत देखील भारतीय संघ चांगली सुरुवात करेल अशी अपेक्षा होती. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण फलंदाज संघाला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत. सलामीवीरांसह संपूर्ण फलंदाजी क्रम एकापाठोपाट विकेट्स गमावताना दिसला. परिणामी इंदोर कसोटीच्या पहिल्या डावात भारताने अवघ्या १०९ धावा करून सर्व विकेट्स गमावल्या.

Story img Loader