IND vs AUS, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकात भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया आपल्या विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात करू इच्छित आहे. ही स्पर्धा जिंकून भारताचा दशकभराचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे की, “कोणत्याही खेळाडूची वैयक्तिक पसंती असू नये, फक्त संघ महत्त्वाचा आणि संघाचे ध्येय महत्त्वाचे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “हार्दिक सारख्या वेगवान गोलंदाजाची उपस्थिती भारताला विश्वचषकादरम्यान तीन फिरकीपटू खेळण्यासाठी पर्याय शोधण्यात नक्कीच मदत करेल. भारताकडे डावखुरा रिस्ट स्पिनर गोलंदाज कुलदीप यादव, ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा हे तिघेही चेपॉकमधील प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होऊ शकतात,” असे संकेत दिले आहेत.

तुम्ही फिरकी गोलंदाजांच्या त्रिकुटासोबत खेळणार आहे का, असे विचारले असता रोहित म्हणाला, “हो, मला असे म्हणायचे आहे की आमच्याकडे खूप पर्याय आहेत, जिथे आम्हाला तीन फिरकी गोलंदाज खेळवता येतील. कारण, मी हार्दिक पांड्याला फक्त गोलंदाज किंवा फलंदाज समजत नाही. तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे जो चांगल्या गतीने गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे आम्हाला एक फलंदाज खेळण्याचा फायदा होतो. यामुळे तसेच, आम्हाला संघात तीन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करता येतो. “

हेही वाचा: IND vs AUS Live Score, WC 2023: टीम इंडिया करणार विश्वचषक २०२३चा श्री गणेशा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी रोहित ब्रिगेड सज्ज

रोहित पुढे म्हणाला , “हार्दिक पांड्यामुळे आम्हाला संघात संतुलन राहते; आम्हाला आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा पर्याय देखील मिळतो. खेळपट्टी कशी दिसते हे आम्हाला पाहावे लागेल, पण हो, तीन फिरकीपटू नक्कीच एक पर्याय आहे,” रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आर. अश्विन, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना प्लेईंग ११मध्ये स्थान दिले आहे.

रोहित प्लेइंग इलेव्हनमध्ये सातत्य ठेवण्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणूनच त्याने सूचित केले की ९ किंवा १० खेळाडू, फिट असल्यास, सर्व सामने खेळतील परंतु प्लेइंग इलेव्हन परिस्थितीवर अवलंबून असेल. तो म्हणाला, “आम्हाला निश्चितपणे खेळाडूंना पूर्ण संधी द्यायची आहे, जिथे आम्हाला सर्वोत्कृष्ट त्यांचे प्रदर्शन देतील. परंतु, तुमच्यासमोरील परिस्थितीनुसार तुम्ही तुमचे सर्वोत्तम ११ निवडू शकता. जिथे संथ गोलंदाजांना थोडी मदत मिळते, तिथे तुम्हाला असे खेळाडू आमच्या संघात आहेत. त्यामुळे, तुमच्या संघाचा गाभा तोच राहील. तुमचे ८, ९, १० खेळाडू तेच राहतील. एक किंवा दोन बदल इकडे तिकडे होतील, जे स्वीकारायला आणि सामावून घेण्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे.”

पुढे भारताचा कर्णधार म्हणाला, “भारतीय संघ नक्कीच या सामन्यात चांगली कामगिरी करेल अशी मला आशा आहे. विश्वचषकात वैयक्तिक आवडीनिवडींना स्थान नाही, असे माझे मत आहे.” तो म्हणाला, “कोणाचीही वैयक्तिक पसंती असू नये. संघ महत्त्वाचा आणि संघाचे ध्येय महत्त्वाचे आहे.” संघ निवडीबाबत रोहित म्हणाला, “पाहा, या परिस्थितीत भारतीय खेळाडूंना खेळण्याचा मोठा अनुभव आहे. आम्ही भरपूर क्रिकेट खेळलो आहोत, कसं खेळायचं हे संघातील प्रत्येकाला ठाऊक आहे. न्याय करणं हे माझं काम नाही, हे त्याचं काम आहे. तुम्ही त्यांना ते स्वातंत्र्य आणि स्पष्टता देता की आम्हाला चाहत्यांकडून अपेक्षित आहे. आता तुम्ही ते कसे करायचे ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.”

हेही वाचा: Asian Games: १९ वर्षीय कुस्तीपटू पंघालने जिंकले कांस्यपदक, महिला कुस्तीत खाते उघडले; पूजा-मानसी आणि चीमा पराभूत

गिलच्या फिटनेसबद्दल काय म्हणाला?

रोहितने अधिकृतपणे सांगितले की डेंग्यूग्रस्त शुबमन गिल त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून तो बाहेर पडला आहे, ज्यामुळे युवा सलामीवीर रविवारपर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता नाही. तो म्हणाला, “नाही, काळजी करण्यासारखे काही नाही. मला म्हणायचे आहे की ती आजारी आहे. माझी सहानुभूती त्याच्याबरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे की, सर्वप्रथम मी एक माणूस आहे, मला त्याने बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे,” कर्णधार म्हणून नंतर विचार करत असतो. मला गिलने पुढच्या सामन्याला खेळायला हवे. त्याआधी त्याने बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. तो युवा खेळाडू आहे. त्याचे शरीर तंदुरुस्त असून त्यामुळे तो लवकर बरा होईल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus team matters teams goal matters captain rohits clear message before the world cup avw