Rohit Sharma on Suryakumar Yadav: भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. हा तोच सूर्या आहे ज्याने टी२० मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता, पण एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यरच्या जागी ३२ वर्षीय सूर्यकुमार यादवला संधी मिळाली. पण सलग दोन वनडेत सूर्या फ्लॉप ठरला. पहिल्याच चेंडूवर तो विकेट गमावत आहे. दोन्ही वेळा मिचेल स्टार्कने इनस्विंग चेंडूवर सूर्याला विकेटसमोर पायचीत केले. सोशल मीडियावर लोक सूर्यकुमार यादवऐवजी संजू सॅमसनला संघात संधी देण्याच्या चर्चा करत आहेत. मात्र, या कठीण काळात सूर्याला कर्णधार रोहित शर्माची साथ लाभली आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला असला तरी आगामी सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला पुरेशी संधी दिली जाईल, असे त्याने म्हटले आहे. कर्णधार म्हणतो की, “सूर्याला माहित आहे की त्याला चांगली कामगिरी करायची आहे आणि संघ व्यवस्थापन त्याला वारंवार संधी देईल. पण यानंतर आता म्हणू नका पुरेशी संधी दिली नाही. सगळ्यांना आम्ही योग्य संधी देत असतो. जो अपयशी ठरतो त्याला आम्ही पाठिंबा देतो. बाहेर देखील अनेक खेळाडू आहेत जे संघात येण्याची वाट पाहत आहेत. त्यांनाही लवकरच संधी मिळेल असे तो म्हणाला.”

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
IND vs ENG 1st T20I Abhishek Sharma half-century helps India beat England by 7 wickets in Eden Gardens
IND vs ENG : अभिषेक शर्माने मोडला युवराज सिंगचा खास विक्रम, कोलकात्यात साकारली स्फोटक खेळी

हेही वाचा: IND vs AUS ODI: इशान की राहुल? या वादावर कर्णधार हार्दिकने टाकला पडदा! आता शुबमन गिलबरोबर ‘हा’ फलंदाज उतरणार सलामीला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव खातेही उघडू शकला नाही, दोन्ही सामन्यांमध्ये त्याला मिचेल स्टार्कने गोल्डन डकवर बाद केले. शेवटच्या १६ एकदिवसीय डावांमध्ये, त्याने आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावलेले नाही, त्याची सर्वोत्तम धावसंख्या न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ३४ आहे. हा खराब फॉर्म असूनही सूर्यकुमार यादवला संधी दिल्याबद्दल रोहित पुढे म्हणाला की. “श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबद्दल आम्हाला माहिती नाही. त्यांची जागा रिक्त आहे, त्यामुळे आम्ही सूर्याला मैदानात उतरवू. जर आणखी कोणाची गरज भासल्यास त्याला देखील संधी देण्यात येईल.” संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ यांचे नाव न घेता त्याने “या दोघांच्या बाबतीत संघ व्यवस्थापन विचार करत आहे असे तो म्हणाला.”

कर्णधार रोहित पुढे म्हणाला, “गेल्या दोन सामन्यांमध्ये तो लवकर बाद झाला, पण त्याला अधिक सेट होण्यासाठी सलग सात-आठ किंवा दहा सामने द्यावे लागतील. सध्या त्याला कोणी दुखापत झाल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संधी मिळत आहे. संघ व्यवस्थापनाचे काम खेळाडूंना संधी देणे आहे आणि जेव्हा त्यांना वाटत असेल की ते सोयीस्कर नाहीत किंवा धावा होत नाहीत, तेव्हा ते याचा विचार करतील. सध्या आपण त्या मार्गावर नाही आहोत.”

हेही वाचा: WPL 2023, GG-W vs DC-W: गुजरातचे स्पर्धेतील आव्हान कायम! अटीतटीच्या सामन्यात दिल्लीवर केली ११ धावांनी मात

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर संपूर्ण भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि अवघ्या २६ षटकात ११७ धावांवर गारद झाला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ३१ धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ५ बळी घेतले. हे सोपे लक्ष्य पाहुण्यांनी एकही विकेट न गमावता अवघ्या ११ षटकांत पूर्ण केले. तीन सामन्यांच्या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी झाली आहे.

Story img Loader