IND vs BAN 1st Test Rohit Sharma raises Rishabh Pant video viral : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने ६३३ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. चेन्नई येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने स्फोटक फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. एकेकाळी भारताची धावसंख्या ३ बाद ३४ धावा अशी होती. यानंतर ऋषभ पंतने यशस्वी जैस्वालसह आपल्या संघाची पडझड थांबवली. त्याने ५२ चेंडूत ३९ धावांची जलद खेळी करत बांगलादेशी गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्यासाठी टाळ्या वाजवून कौतुक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने पहिल्या तासातच भारताच्या टॉप-३ फलंदाजांना ३४ धावांपर्यंत रोखले. अशा स्थितीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतने सलामीवीर यशस्वी जैस्वाल सोबत जबाबदारी स्वीकारली आणि टीम इंडियाला आणखी धक्का बसू दिला नाही. बांगलादेशी वेगवान गोलंदाज आक्रमण करण्याआधीच ऋषभ पंतने स्फोटक फलंदाजीला सुरुवात केली. ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वालने चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली.

रोहित शर्माला टाळ्या वाजवायला भाग पाडले –

ऋषभ पंतने ७५.०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ६ चौकार मारले. ऋषभ पंतची तुफानी फलंदाजी पाहून कर्णधार रोहित शर्मालाही टाळ्या वाजवायला भाग पाडले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऋषभ पंतने आक्रमकता कायम ठेवली. ऋषभ पंत केवळ चौकार मारण्याचा प्रयत्न करत नव्हता तर संधी मिळताच एकेरी धाव घेण्याचाही प्रयत्न करत होता. भारतीय डावाच्या २६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतला लिटन दासने वेगवान गोलंदाज हसन महमूदकरवी झेलबाद केले.

हेही वाचा – IND vs BAN : ‘शुबमन भारताचा बाबर आझम…’, बांगलादेशविरुद्ध शून्यावर बाद झाल्याने सोशल मीडियावर ट्रोल

ऋषभ पंत ५२ चेंडूत ३९ धावांची झटपट खेळी करून बाद झाला. ऋषभ पंतला मोठी खेळी करता आली नसली तरी त्याने ३४/३ अशा कठीण परिस्थितीतून टीम इंडियाची सुटका केली. भारताने वृत्ती लिहिपर्यंत ५० षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावात ६ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा राहुल (१४ धावा) आणि रविचंद्रन अश्विन(२४ धावा) क्रीजवर आहेत.

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने पहिल्या तासातच भारताच्या टॉप-३ फलंदाजांना ३४ धावांपर्यंत रोखले. अशा स्थितीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतने सलामीवीर यशस्वी जैस्वाल सोबत जबाबदारी स्वीकारली आणि टीम इंडियाला आणखी धक्का बसू दिला नाही. बांगलादेशी वेगवान गोलंदाज आक्रमण करण्याआधीच ऋषभ पंतने स्फोटक फलंदाजीला सुरुवात केली. ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वालने चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली.

रोहित शर्माला टाळ्या वाजवायला भाग पाडले –

ऋषभ पंतने ७५.०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ६ चौकार मारले. ऋषभ पंतची तुफानी फलंदाजी पाहून कर्णधार रोहित शर्मालाही टाळ्या वाजवायला भाग पाडले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऋषभ पंतने आक्रमकता कायम ठेवली. ऋषभ पंत केवळ चौकार मारण्याचा प्रयत्न करत नव्हता तर संधी मिळताच एकेरी धाव घेण्याचाही प्रयत्न करत होता. भारतीय डावाच्या २६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतला लिटन दासने वेगवान गोलंदाज हसन महमूदकरवी झेलबाद केले.

हेही वाचा – IND vs BAN : ‘शुबमन भारताचा बाबर आझम…’, बांगलादेशविरुद्ध शून्यावर बाद झाल्याने सोशल मीडियावर ट्रोल

ऋषभ पंत ५२ चेंडूत ३९ धावांची झटपट खेळी करून बाद झाला. ऋषभ पंतला मोठी खेळी करता आली नसली तरी त्याने ३४/३ अशा कठीण परिस्थितीतून टीम इंडियाची सुटका केली. भारताने वृत्ती लिहिपर्यंत ५० षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावात ६ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा राहुल (१४ धावा) आणि रविचंद्रन अश्विन(२४ धावा) क्रीजवर आहेत.