भारतीय क्रिकेट संघाने टी२० विश्वचषक २०२२ नंतर बांगलादेशकडून एकदिवसीय मालिका गमावली. या पराभवानंतर काही खेळाडूंच्या कामगिरीचीही चर्चा होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देखील खालच्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशकडून झालेल्या पराभवामुळे ‘अत्यंत चिंतित’ आहे. आता बोर्ड कठोर निर्णय घेण्याची तयारी करत आहे. याबाबत आढावा बैठकही बोलावण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेश दौऱ्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली

बांगलादेशने भारताविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता मालिका पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआय आढावा बैठक बोलावणार आहे. ही बैठक टी२० विश्वचषक २०२२ नंतर होणार होती पण ती पुढे ढकलण्यात आली. इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, बांगलादेश मालिका पूर्ण झाल्यानंतर बोर्डाने ‘पुनरावलोकन बैठक’ बोलावली आहे. संघ बांगलादेश दौऱ्यावरून परतल्यानंतर बीसीसीआयचे अधिकारी आता प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांची भेट घेणार आहेत.

हेही वाचा: IND vs BAN: “आमचा खेळण्याचा दृष्टीकोन हा एक दशक…” माजी क्रिकेटपटूंची टीम इंडियावर चोहीकडून टीका

पराभव पचवणं कठीण

बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, “हा पराभव पचवणे खरोखर कठीण आहे. यावर खरोखर विश्वास ठेवता येत नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर लगेचच आम्ही प्रलंबित आढावा बैठक घेणार आहोत. गोष्टी रुळावर आणण्यासाठी काही कठोर पावले उचलावी लागतील. आम्ही तुम्हाला सांगतो की टी२० विश्वचषक २०२२ च्या सेमीफायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला आणि अंतिम फेरीत या संघाने पाकिस्तानचा पराभव करून चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.

हेही वाचा: IND vs BAN: “हाफ-फिट खेळाडू देशासाठी खेळत आहेत…’: दुखापतीनंतर निराश रोहित शर्माचा एनसीएला कडक इशारा

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा पराभव चर्चा करून त्यातून तोडगा काढणे खूप गरजेचे आहे. बांगलादेश मालिकेनंतर लगेचच आम्ही प्रलंबित आढावा बैठक घेणार आहोत. भारताच्या खराब कामगिरीमुळे बोर्ड अचंबित झाले आहे. त्याचबरोबर संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंचे वाढते प्रमाणही बोर्डासाठी चिंतेचा विषय आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन बीसीसीआयने बांगलादेश दौऱ्यानंतर मुंबईत संघाची आढावा बैठक बोलावली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban bcci signaled action after team indias defeat big decisions to be taken after bangladesh tour avw