IND vs BAN 1st Test : Basit Ali lashes out Bangladesh Captain : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. चेन्नईच्या मैदानावर भारताने ५१५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा दुसरा डाव २३४ धावांत आटोपला. ज्यामुळे पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून आलेल्या बांगलादेशला भारताने २८० धावांनी पराभवाची धूळ चारली. यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोवर निशाणा साधला आहे. त्याने शांतोला त्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली.

बासित अली काय म्हणाला?

खरं तर, शांतोने पाकिस्तानप्रमाणेच भारताविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकण्याचा मानस व्यक्त केला होता. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी तो म्हणाला होत, “पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक मालिका विजयानंतर बांगालदेश संघाचा आणि देशातील लोकांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. भारताविरुद्धची मालिका आमच्यासाठी महत्वाची असून आम्ही दोन्ही सामने जिंकण्यासाठी खेळू.” या वक्तव्यावरून बासितने शांतोवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, शांतोने भारतासोबत माईंड गेम खेळायला नको होता. कारण भारत खूप मजबूत संघ आहे.

Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
PAK vs BAN Test Ahmad Shahzad mocking on Pakistan team
PAK vs BAN Test Series : लाजिरवाण्या पराभवानंतर अहमद शहजादने पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बांगलादेशने तुम्हाला तुमच्याच…’
Shan Masood Statement on Pakistan Defeat by Bangladesh in 2nd Test
PAK vs BAN: “असं ४ वेळा झालंय…” पाकिस्तानच्या कर्णधाराने कोणावर फोडले लाजिरवाण्या पराभवाचे खापर? पाहा नेमकं काय म्हणाला?
Bangladesh beat Pakistan by 6 wickets
WTC Points Table : पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशची मोठी झेप, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही टाकलं मागे
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
PAK vs BAN Ahmad Shahzad Slams PCB For Pakistan Defeat Against Bangladesh
PAK vs BAN: “माझ्या आयुष्यात पाकिस्तान क्रिकेट इतके खालच्या पातळीवर…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूने PCBला सुनावलं
Kamran Akmal on PAK vs BAN Test
PAK vs BAN : ‘जागतिक स्तरावर पाकिस्तान क्रिकेट चेष्टेचा विषय…’, कामरान अकमलची सडकून टीका; म्हणाला, क्लब क्रिकेटर्स पण…

बासित अलीची शांतोवर टीका –

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाला, “भारताने पहिली कसोटी सहज जिंकली. भारत जिंकण्यासाठी पात्र होता. भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये खूप फरक आहे. बांगलादेशला हे समजले असेल. भारताने दाखवून दिले की त्यांच्यात आणि बांगलादेशच्या क्रिकेटमध्ये काय फरक आहे. त्यामुळे आता बांगलादेशला नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना होणारे नुकसान लक्षात आले असेल. लक्षात ठेवा, जे संघ कसोटीच्या पहिल्या दोन तासांबद्दल विचार करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत. जे सामन्याच्या शेवटापर्यंतचा विचार करुन रणनिती आखतात ते विजयी होतात.”

हेही वाचा – IND vs BAN: पहिल्या कसोटीनंतर WTC Final मध्ये जाण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या समीकरण

भारतासोबत माईंड गेम खेळायला नको होता –

तो पुढे म्हणाला, “पाच गोलंदाज खेळवून काय फायदा होतो, हे सर्वांनी पाहिले आहे. गंभीर म्हणाला होता की मला २० विकेट्स हव्या आहेत. सामने विकेट्स घेऊनच जिंकले जातात. दुसऱ्या डावात भारताने किती विकेट गमावल्या हे तुम्ही बघा. फक्त चार खेळाडू आऊट झाले. या सामन्यात बांगलादेशने १४ विकेट्स घेतल्या तर भारताने २० विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये तुम्हाला ६ विकेट्सचे नुकसान दिसून येईल. त्यामुळे शांतोने मालिकेपूर्वी २-० ने जिंकू, असे वक्तव्य करुन माईंड गेम खेळायला नको होता. कारण हा पाकिस्तानचा संघ नाही.”