India vs Bangladesh, World Cup 2023: आज एकदिवसीय विश्वचषक २०२३चा १७वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून आतापर्यंतचे तीनही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, बांगलादेश संघाने तीनपैकी एक सामना जिंकला असून दोन गमावले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार शकीब अल हसन बांगलादेशकडून खेळत नाही. त्याच्या संघासाठी हा मोठा धक्का आहे. शाकिब हा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या जागी नझमुल हसन शांतो कर्णधार आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. अशा स्थितीत नाणेफेक हरल्यानंतरही फारसे नुकसान होत नाही. रोहितने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Icc test rankings updates in marathi
Test Rankings : ICC ची ताजी कसोटी क्रमवारी जाहीर! यशस्वी जैस्वालला फायदा तर बाबर आझमला बसला मोठा फटका
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
World Test Championship 2025 How Pakistan Qualify for Final Match
PAK vs BAN: बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो? काय आहे समीकरण?
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
Kamran Akmal on PAK vs BAN Test
PAK vs BAN : ‘जागतिक स्तरावर पाकिस्तान क्रिकेट चेष्टेचा विषय…’, कामरान अकमलची सडकून टीका; म्हणाला, क्लब क्रिकेटर्स पण…
Pakistan drop in the World Test Championship table after defeat against Bangladesh
PAK vs BAN : पाकिस्तानची बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट विश्वात फजिती! डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही घसरण
Bangladesh beat Pakistan by 10 Wickets 1st Time history of Test Cricket
PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय
Murder case filed against Shakib Al Hasan
Shakib Al Hasan : धक्कादायक! बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनविरोधात खुनाचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

१९९८ नंतर भारतातील उभय संघांमधील पहिला एकदिवसीय सामना

भारतीय भूमीवर दोघांमधील हा केवळ चौथा एकदिवसीय सामना असेल. भारतातील वनडेमध्ये दोन्ही संघ केवळ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. २५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९८ मध्ये भारतीय भूमीवर दोघेही शेवटचे आमनेसामने आले होते. भारताने घरच्या मैदानावर तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशचा पराभव केला आहे. १९९० मध्ये चंडीगडमध्ये भारताने बांगलादेशचा नऊ विकेट्सने पराभव केला होता.

यानंतर १९९८ मध्ये मोहालीत बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव झाला होता. १९९८ मध्येच वानखेडेवर भारताने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव केला होता. २५ वर्षांनंतर बांगलादेशचा संघ भारतीय भूमीवर खेळायला येईल तेव्हा त्यांच्या मनात हा विक्रम नक्कीच असेल. मात्र, ही लढत रंजक असणार आहे. या तीन सामन्यांव्यतिरिक्त, भारताने बांगलादेशमध्ये २५ सामने आणि कोणत्याही तटस्थ ठिकाणी १२ सामने खेळले आहेत.

एकदिवसीय विश्वचषकातील दोन्ही संघांचे विक्रम

एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने तीन सामने जिंकले असून बांगलादेशने केवळ एकच सामना जिंकला आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथे २००७च्या विश्वचषकात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले होते. त्या सामन्याची इतिहासाच्या पानात नोंद झाली.

बांगलादेशने ग्रुप स्टेजमध्ये राहुल द्रविडच्या भारतीय संघाचा पाच गडी राखून पराभव करून मोठा अपसेट निर्माण केला. यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपमधूनच बाहेर पडली. २०११च्या विश्वचषकात, मीरपूरमध्ये ग्रुप स्टेजमध्ये दोघे पुन्हा आमनेसामने आले. यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशचा ८७ धावांनी पराभव केला. या सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांनी शतके झळकावली होती. यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१५ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा १०९ धावांनी पराभव केला होता. २०१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बर्मिंगहॅममध्ये बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. आता २०२३च्या विश्वचषकात दोघांमधील हा पाचवा सामना असेल.

हेही वाचा: IND vs BAN, World Cup: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने टीम इंडियाला दिला सल्ला; म्हणाला, “हलक्यात घेऊ नका…”

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश: लिटन दास, तनजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), नसुम अहमद, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.