IND vs BAN Match Updates World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या १७ व्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आहे. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना आठ गडी गमावून २५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर ३ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. विराट कोहलीला शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता भारताचे ४ सामन्यांत ८ गुण झाले आहेत. मात्र, भारतीय संघ अजूनही गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचेही ४ सामन्यात ८गुण आहेत, मात्र टीम इंडियापेक्षा चांगल्या नेट रनरेटमुळे किवी संघ अव्वल स्थानावर आहे.

विराट कोहलीने झळकावले शानदार शतक –

भारतीय गोलंदाजांनंतर फलंदाजांनी आपली ताकद दाखवून दिली. टीम इंडियासमोर २५७ धावांचे लक्ष्य होते. भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ४० चेंडूत ४८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शुबमन गिलने पन्नास धावांचा टप्पा पार केला. शुबमन गिल ५५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला.

यानंतर विराट कोहलीने उर्वरित काम पूर्ण केले. विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. भारताचा माजी कर्णधार ९७ चेंडूत १०३ धावा करून नाबाद परतला. श्रेयस अय्यर अवघ्या १९ धावा करून बाद झाला. याशिवाय केएल राहुल ३४ चेंडूत ३४ धावा करून नाबाद राहिला. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मेहंदी हसन मिराजने २ विकेट्स घेतल्या. या खेळाडूने शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरला बाद केले. याशिवाय हसन महमूदला एक विकेट मिळाली. हसन महमूदने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले.

तत्पूर्वी तन्जिद हसन (५१), लिटन दासची (६६) अर्धशतकं आणि अखेच्या षटकांमध्ये महमदुल्लाहने (४६) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने निर्धारित ५० षटकांमध्ये ८ बाद २५६ धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवने १-१ विकेट घेतली.

आता भारताचे ४ सामन्यांत ८ गुण झाले आहेत. मात्र, भारतीय संघ अजूनही गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचेही ४ सामन्यात ८गुण आहेत, मात्र टीम इंडियापेक्षा चांगल्या नेट रनरेटमुळे किवी संघ अव्वल स्थानावर आहे.

विराट कोहलीने झळकावले शानदार शतक –

भारतीय गोलंदाजांनंतर फलंदाजांनी आपली ताकद दाखवून दिली. टीम इंडियासमोर २५७ धावांचे लक्ष्य होते. भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ४० चेंडूत ४८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शुबमन गिलने पन्नास धावांचा टप्पा पार केला. शुबमन गिल ५५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला.

यानंतर विराट कोहलीने उर्वरित काम पूर्ण केले. विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. भारताचा माजी कर्णधार ९७ चेंडूत १०३ धावा करून नाबाद परतला. श्रेयस अय्यर अवघ्या १९ धावा करून बाद झाला. याशिवाय केएल राहुल ३४ चेंडूत ३४ धावा करून नाबाद राहिला. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मेहंदी हसन मिराजने २ विकेट्स घेतल्या. या खेळाडूने शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरला बाद केले. याशिवाय हसन महमूदला एक विकेट मिळाली. हसन महमूदने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले.

तत्पूर्वी तन्जिद हसन (५१), लिटन दासची (६६) अर्धशतकं आणि अखेच्या षटकांमध्ये महमदुल्लाहने (४६) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने निर्धारित ५० षटकांमध्ये ८ बाद २५६ धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवने १-१ विकेट घेतली.